चालू आठवडय़ात जाहीर होणार प्रभाग रचना, आरक्षण; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या हालचालींना वेग

चालू आठवडय़ात जाहीर होणार प्रभाग रचना, आरक्षण; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या हालचालींना वेग

राज्यातील रखडलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी हालचालींना वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेसाठी राज्य सरकारला सूचनाही दिली आहे. सरकारकडून माहिती मिळताच चालू आठवडय़ातच प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर होऊ शकते असे निवडणूक आयोगातील सूत्रांनी सांगितले.

राज्यात सध्या बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक राजवट आहे. यामुळे लोकप्रतिनिधींचा सहभाग नसेलली ही यंत्रणा केवळ अधिकारी वर्गाच्या ताब्यात आहे. सर्वोच्च न्यायालयाने मागील महिन्यात स्पष्ट आदेश देत चार महिन्यांच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी आणि त्याआधी चार आठवडय़ांत अधिसूचना जाहीर करावी, असे निर्देश दिले होते.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रभाग रचनेचा अधिकार राज्य सरकारने स्वतःकडे घेतला होता. परिणामी, आता निवडणूक आयोगाने प्रभाग रचना पूर्ण करण्याची जबाबदारी पुन्हा राज्य सरकारवर सोपवली आहे.

प्रभाग रचनेची प्राथमिक प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात असून, याच आठवडय़ात ती माहिती आयोगाकडे सादर होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. राज्य सरकारकडून माहिती मिळताच, त्या आधारे प्रभागांचे आरक्षण आणि मतदार याद्या अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू होईल. प्रभाग रचना, आरक्षण व मतदार याद्या हे तीन महत्त्वाचे टप्पे पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्ष निवडणुकांची घोषणा होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

क्या हुआ तेरा वादा? शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर जाब विचारण्यासाठी उद्यापासून शिवसेनेचे मराठवाड्यात आंदोलन क्या हुआ तेरा वादा? शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर जाब विचारण्यासाठी उद्यापासून शिवसेनेचे मराठवाड्यात आंदोलन
सत्ता मिळवण्यासाठी निवडणूक प्रचारात महायुती सरकारने शेतकर्‍यांना अनेक आमिषे दाखवली होती. मात्र सत्ता मिळताच शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार्‍या सरकारला शिवसेना ‘क्या...
निवृत्तीनंतर न्यायमूर्तींनी राजकारणात प्रवेश करणं न्यायव्यवस्थेच्या स्वायत्ततेवर आणि निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं, सरन्यायाधीशयांनी व्यक्त केली चिंता
Bangalore Stampede : 35 हजार क्षमतेच्या स्टेडियममध्ये 3 लाख चाहते पोहोचले, बंगळुरूतील चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा वाढला
बँकाचे हजारो कोटी बुडवणाऱ्या व्यावसायिकाला गुजरात उच्च न्यायालयाने दिली परदेशी जाण्याची परवानगी
Beauty Tips- सुंदर दिसण्यासाठी इतके पाणी प्यायलाच हवे
Ratnagiri News – भाट्ये समुद्रकिनारी सापडले निळ्या रंगाचे मुळे
श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी टोकन पध्दत सुरू, भाविकांना दर्शनपासाचे करावे लागणार ऑनलाईन बुकींग