Air India Plane Crash : मृतांच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत जाहीर, टाटा ग्रुपनंतर एअर इंडियाची घोषणा
अहमदाबाद येथे गुरुवारी झालेल्या एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना आणि एकमेव बचावलेल्या प्रवाशाला तात्काळ आर्थिक मदत म्हणून एअर इंडियाने प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही रक्कम टाटा सन्सने यापूर्वी जाहीर केलेल्या प्रत्येकी 1 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईच्या व्यतिरिक्त आहे.
एअर इंडियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टमध्ये शेअर करत ही माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “या अपघातात जीव गमावलेल्या सर्व प्रवाशांच्या कुटुंबियांसोबत आम्ही उभे आहोत. आमचे पथक या कठीण काळात सर्वतोपरी मदत करत आहेत.”
दरम्यान, गुरुवारी दुपारी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणारे एअर इंडियाचे बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमान (फ्लाइट AI171) उड्डाणानंतर काही मिनिटांतच मेहगनीनगर परिसरात कोसळले. या दुर्घटनेत 242 प्रवाशांपैकी 241 प्रवाशांचा आणि खालील 29 जणांचा मृत्यू झाला, तर एकमेव प्रवासी (आसन क्रमांक 11ए) वाचला. याशिवाय बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाचेही मोठे नुकसान झाले आहे.
#ImportantUpdate
Air India stands in solidarity with the families of the passengers who tragically lost their lives in the recent accident. Our teams on the ground are doing everything possible to extend care and support during this incredibly difficult time.As part of our…
— Air India (@airindia) June 14, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List