श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दर्शन रांगेतील घुसखोरी बंद, मंदिर प्रशासनाने बसवल्या तारेच्या जाळ्या

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दर्शन रांगेतील घुसखोरी बंद, मंदिर प्रशासनाने बसवल्या तारेच्या जाळ्या

आषाढी यात्रेला भाविकांची संख्या लाखोंच्या पटीत वाढणार आहे. यात्रेला आलेले भाविक हे श्री विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन घेण्यास उत्सुक असतात. त्यामुळे हे भाविक दर्शन रांगेत तासनतास उभे राहतात. दर्शन रांगेत थांबूनच श्री विठ्ठलाचे दर्शन घेतात. मात्र, दर्शन रांगेत घुसखोरी होऊ नये, रांगेत थांबलेल्या भाविकांना दर्शनासाठी विलंब होऊ नये,म्हणून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने दर्शन रांगेला तारेची जाळी बसवली आहे. यामुळे आता कुणालाही अधुनमधुन घुसखोरी करता येणार नाही.

श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांनी संख्या दिवसेदिवस वाढत आहे. यातच आता भाविकांना आषाढी यात्रेचे वेध लागले आहेत. आषाढी यात्रा सुरक्षित रित्या पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनासह श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती देखील विविध उपाय योजना राबवू लागली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व सदस्य यांनी निर्णय घेत दर्शन रांगेत होणारी घुसखोरी रोखण्यासाठी तारेची जाळी बसवण्यात आली आहे. यामुळे भाविकांना दर्शन रांगेत घुसखोरी करता येणार नाही. यामुळे दर्शन रांगेत घडणाऱ्या वादविवादांना आपोआप आळा बसणार आहे. तारेची जाळी बसविण्यात आल्याने सर्वसामान्य भाविकांचे विशेषत: महिला भाविकांचे पर्स, मोबाईल अशा चोरीच्या घटनांही आळा बसण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, दर्शन रांगेत चार ते पाच किमी पर्यंत तारेची जाळी बसविण्यात येत आहे. त्यामुळे घुसखोरी टळली जाणार आहे. तसेच अनुचित प्रकार घडू नये, म्हणून ठरावीक अंतरावर भाविकांना दर्शन रांगेत प्रवेश देण्यासाठी गेट ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे या गेटमधून आपतकालीन प्रसंगी दर्शन रांगेतील भाविकांना तारेच्या जाळीमधून बाहेर काढता येणे शक्य आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबई – गोवा महामार्गावरील घाट प्रवास बिकट मुंबई – गोवा महामार्गावरील घाट प्रवास बिकट
मुंबई–गोवा महामार्गावरील अवघड वळणे जीवघेणी ठरत आहेत. महामार्गाचे अर्धवटस्थितीत काम आणि ठिकठिकाणी असलेले पर्यायी रस्ते पावसाळ्य़ात अधिक धोकादायक ठरत आहेत....
फडणवीस-राज ठाकरे भेट… मिंधेंना टेन्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीला आव्हान, 16 जूनपर्यंत लेखी युक्तिवाद सादर करा; हायकोर्टाचे याचिकाकर्त्यांना आदेश
मतचोरीबाबत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची सारवासारव, कायद्यांनुसार मतदारांची नावे समाविष्ट किंवा वगळण्याची तरतूद नाही
अखेर कामाठीपुराचा पुनर्विकास मार्गी लागणार, 8 हजार रहिवाशांना मिळणार हक्काचे घर; कन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट एजन्सी नेमण्यासाठी म्हाडातर्फे निविदा प्रसिद्ध 
प्रकल्पग्रस्तांसाठी आता मुलुंडमध्ये 6731 घरे, पालिकेचे प्रकल्प मार्गी लागणार
वरळी, नायगाव बीडीडीवासीयांना सप्टेंबरमध्ये मिळणार नव्या घरांच्या चाव्या; ना. म. जोशी मार्गावरील रहिवाशांना डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा