चंद्रपुरातील नरभक्षक वाघीण अखेर जेरबंद, 12 दिवसांत घेतला 9 जणांचा बळी

चंद्रपुरातील नरभक्षक वाघीण अखेर जेरबंद, 12 दिवसांत घेतला 9 जणांचा बळी

चंदपूर जिह्यात हैदोस घालून तब्बल 9 जणांचा बळी घेणाऱ्या नरभक्षी वाघिणीला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. तळोधी परिसरातून या वाघिणीला पकडण्यात आले. वनखात्याच्या पथकासह पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, शूटर अजय मराठे यांनी आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास वाघिणीला बेशुद्ध करून पकडले. या वाघिणीला नागपूर येथील गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रात आणण्यात येणार आहे.

नागभीड तालुक्यातील तळोधी बा वनपरिक्षेत्रातील आलेवाही बीटमधील कक्ष क्रमांक 697 मध्ये रविवारी वाढोणा येथील मारोती नकडू शेंडे हा इसम आपली पत्नी व अन्य नागरिकांसह सकाळी तेंदूपत्ता तोडण्यासाठी सकाळी गेला होता. तलाव परिसरात दबा धरून बसलेल्या वाघिणीने त्याच्यावर मागून हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला नकडू शेंडे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

  • 11 मे रोजी मूल तालुक्यातील नागाळा गावातील विमल बुद्धाजी शेंडे ही महिला चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील 537 कंपार्टमेंटमध्ये तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेली असता वाघिणीच्या हल्ल्यात ठार झाली.
  • 12 मे रोजी मूल तालुक्यात वडीलांकडे राहत असलेल्या भादुर्णा येथील भूमिका दिपक भेंडारे हिचा वाघिणीच्या हल्ल्यात मृत्यू झाला.
  • 14 मे रोजी चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरीक्षेत्रामधील करबडा येथे कचराबाई अरुण भरडे (54) ही महिला तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेली होती. वाघिणीने तिला ठार केले.
  • रविवार 18 मे रोजी नागभीड व मूल तालुक्यात दोघांचा वाघिणीने बळी घेतला. मूल तालुक्यातील भादुर्णी येथील ऋषी झुगांजी पेंदोर (70) यांनाही वाघिणीने ठार केले होते.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आतड्यातील घाण झटक्यात होईल स्वच्छ, उपाशी पोटी सेवन करा या पाच गोष्टी आतड्यातील घाण झटक्यात होईल स्वच्छ, उपाशी पोटी सेवन करा या पाच गोष्टी
डाळिंबात फायबर असते. डाळिंबाच्या सेवनाने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. तुमची पचनसंस्था निरोगी राहते. डाळिंबामुळे अन्न लवकर पचते. तसेच पोटात मल सडत...
India Squad For England Tour – इंग्लंड दौऱ्यात गिल कर्णधार, तर उपकर्णधारपदीही नवा खेळाडू; हिंदुस्थानचा संपूर्ण संघ जाणून घ्या…
हे राम… जव्हार येथे चोरट्यांनी हद्दच केली; स्मशानभूमीतील चितेचे लोखंडी स्टँडच चोरट्यांनी कापून नेले
ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात ‘कोरोना वॉर्ड’; कोपरीत तीन रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर, 40 कोविड बेड सज्ज
SDM वर बंदूक रोखणाऱ्या भाजप आमदाराचे सदस्यत्व रद्द; राजस्थान विधानसभा अध्यक्षांची कारवाई
Karuna Munde : त्या सुंदर दिसतात म्हणून…, वादात करुणा मुंडेंची उडी, आरोपांच्या अशा उडवल्या फैरी
काळजाचा ठोकाच चुकला… विराटला चेंडू लागताच अनुष्काचा जीव खालीवर