जिमला न जाताही तुम्ही वजन कमी करू शकता, फक्त प्या ‘हे’ हर्बल

जिमला न जाताही तुम्ही वजन कमी करू शकता, फक्त प्या ‘हे’ हर्बल

आजकाल अस्वस्थ जीवनशैलीमुळे तसेच खाण्या-पिण्यावर नियंत्रण नसल्याने वजन वाढण्याच्या समस्या आता सामान्य झाले आहे. बहुतेक लोकं वाढत्या वजनाने त्रस्त आहेत. काही लोक वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जाऊन तासंतास घाम गाळतात, तेव्हा कुठे शरीरातील फॅट कमी होतात. पण अशी काही लोकं आहेत ज्यांना जिमला जाण्यासाठी वेळ नसतो किंवा त्यांना जिममध्ये जायला आवडत नाही. या लोकांसाठी वजन कमी करणे खूप आव्हानात्मक ठरतं. अशातच आजच्या या लेखात आपण काही सोपा उपाय सांगणार आहोत ज्याच मदतीनं तुम्ही जिममध्ये न जाता घरी वजन कमी करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात…

दालचिनी आणि लिंबू पाणी

फॅट लवकर कमी करण्यासाठी तुम्ही दालचिनी आणि लिंबू पाणी पिऊ शकता. लिंबू आणि दालचिनी हे दोन्ही नैसर्गिक डिटॉक्सिफायर्स आहेत जे शरीरातील घाण काढून टाकण्याचे काम करतात. दालचिनी आणि लिंबू पाणी शरीराला आतून स्वच्छ ठेवते आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगली राहते.

दालचिनी आणि लिंबू पाणी कसे बनवायचे?

एक कप कोमट पाणी घ्या.

या पाण्यात दालचिनी पावडर टाका.

1 चमचा लिंबाचा रस

चवीकरिता 1 चमचा मध

पाणी हलके गरम करा, नंतर त्यात दालचिनी पावडर टाका आणि 5 मिनिटे असेच राहू द्या. त्यानंतर त्यात लिंबाचा रस आणि मध टाकून दोन्ही मिश्रण पाण्यात चांगले मिक्स करा. त्यानंतर हे हर्बल पेय तयार आहे. हे पेय दररोज प्यायल्याने तुमचे वजन कमी होऊ शकते. याशिवाय तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी हे पेय देखील पिऊ शकता.

या गोष्टी लक्षात ठेवा

त्याशिवाय जेवण जेवताना नेहमी शांतपणे जेवा. जे काही खाल ते हळूहळू चावून खा, यामुळे मेंदूला हे समजण्यासाठी वेळ मिळतो की पोट भरलं आहे. अशानं तुमचं ओव्हरईटिंग टाळलं जातं आणि वजन वाढत नाही.

तसेच हे हर्बल पेय पिण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या. रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय हे पाणी पिऊ नये. जर तुमचे डॉक्टर तुम्हाला ते पिण्याचा सल्ला देतील तरच हे पाणी प्या.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकुळ, महाराष्ट्र 20 टक्के कमिशनचे राज्य झाले आहे – विजय वडेट्टीवार राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकुळ, महाराष्ट्र 20 टक्के कमिशनचे राज्य झाले आहे – विजय वडेट्टीवार
पुण्यात कोयत्या गँगने धुमाकुळ घातला होता, पण दुसरीकडे सत्ताधाऱ्यांची टॉवेल बनियन गँग आता कार्यरत झाली आहे. त्यांच्या मनासारखे नाही झाले...
सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यास अपयशी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप
विधानभवनाच्या लॉबीत राडा, गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; मलाच मारण्यासाठी आले होते, आव्हाडांचा आरोप
Ratnagiri News – एसटी आणि मिनी बसचा भीषण अपघात, 34 प्रवासी जखमी
‘या’ लक्षणांवरून ओळखा आतड्यांचे आरोग्य बिघडलं, सुधारण्यासाठी करा हे उपाय
Video – ही जर का परिस्थिती राज्याची आली असेल तर मग विधानभवनाला अर्थ काय?
ही जर का परिस्थिती राज्याची आली असेल तर मग विधानभवनाला अर्थ काय? विधिमंडळातील राड्यावरून उद्धव ठाकरे यांनी सरकारला घेरले