सततची नापिकी व वाढत्या कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
लातूरमधील देवणी तालुक्यातील गुरधाळ येथील एका शेतकऱ्याने सततची नापिकी व वाढत्या कर्जाला कंटाळून बुधवारी घराच्या स्लॅब च्या कडीला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. श्रीधर पंढरी घोगरे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.
घोगरे यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतून कर्ज घेतले होते. पेरणीनंतर तब्बल 40 दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने यावर्षीही नापिकी होणार. आता बँकेचे कर्ज कसे फेडायचे व घर प्रपंच कसा भागवायचा या विवंचनेत ते गेल्या काही दिवसांपासून होते असे त्यांच्या नातलगांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List