पाकिस्तानने शस्रसंधीसाठी केला होता दोन वेळा फोन, पाकिस्तानात 160 जणांचा मृत्यू

पाकिस्तानने शस्रसंधीसाठी केला होता दोन वेळा फोन, पाकिस्तानात 160 जणांचा मृत्यू

ऑपरेशन सिंदूरनंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानात तणाव निर्माण झाला होता. पण त्यावेळी पाकिस्तानने शस्त्रसंधीसाठी दोन वेळा फोन केला होता. तसेच हिंदुस्थानने केलेल्या हल्ल्यात 160 जणांचा मृत्यू झाला होता अशी माहिती समोर आली आहे.

आज तकने याबाबतीत वृत्त दिले आहे. शस्त्रसंधीसाठी पाकिस्ताने दोनदा फोन केला होता. एकदा 7 मे रोजी सांयकाळी आणि दुसरा फोन 10 तारखेला दुपारी 3.35 मिनिटांनी केला होता. दोन्ही वेळेला पाकिस्तानने शस्त्रसंधीसाठी फोन केला होता. यावेळी पाकिस्तानच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशन्सकडून हिंदुस्थानला औपचारिकरित्या संपर्क साधला होता. सात मे रोजी हिंदुस्थानने पाकिस्तान आणि पाक व्याप्त कश्मीरमध्ये अनेक दहशदवादी तळ उद्ध्वस्त कले होते.

हिंदुस्थानने पाकिस्तानमध्ये केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे 160 लोक मारले गेल्याची माहिती आहे. पण यात बहुतांश दहशतवादी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. बहावलपूरमध्ये 20 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता, त्यात मसूद अजहरच्या कुटुंबीयांचा समावेश होता. हिंदुस्थानने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानच्या 40 सैनिकांचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Srujan 2025 : सस्टेनेबल इकोसिस्टमच्या निर्मितीसाठी एक दिवसीय परिसंवाद Srujan 2025 : सस्टेनेबल इकोसिस्टमच्या निर्मितीसाठी एक दिवसीय परिसंवाद
शाश्वततेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत ‘सृजन 2025’ या विषयावर आधारित एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन ‘First Sunday’ या संस्थेने केले...
Nanded News – पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा खदानीत बुडून मृत्यू
मन:शांतीसाठी धनंजय मुंडे इगतपुरीत, विपश्यना केंद्रात दाखल झाल्याची चर्चा
IPL 2025 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची नऊ वर्षानंतर फायनलमध्ये धडक,पंजाब किंग्जचा केला दणदणीत पराभव
पहिल्याच पावसात केईएम रुग्णालयात पाणी साचलं, हाय कोर्टाकडून गंभीर दखल, बीएमसीला नोटीस
आम्ही हल्ला करायच्या आधीच हिंदुस्थानने ब्रह्मोस मिसाईलने हल्ले केले, पाकिस्तानी पंतप्रधानांची कबूली
पाकिस्तानच्या विमानतळावर टॉयटेलाही पाणी नाही, अभिनेत्रीने केली स्वतःच्या देशाची पोलखोल