देश दुखवटा पाळत असताना सत्कार सोहळे करून घेताना भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही? अतुल लोंढे यांची टीका

देश दुखवटा पाळत असताना सत्कार सोहळे करून घेताना भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही? अतुल लोंढे यांची टीका

जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी 26 निष्पाप पर्यटकांची हत्या केल्याने देशात दुखवटा पाळला जात आहे. संपूर्ण देश या घटनेने हादरला असून जनतेत तीव्र रोष आहे. अशा दुःखद प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नेते व मंत्री सत्कार सोहळे करून घेत आहेत, हे अत्यंत संताप आणणारे कृत असून सत्कार सोहळे करून घेताना भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना अतुल लोंढे म्हणाले की, अमरावती मध्ये 26 तारखेला भाजपा नेत्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री दत्ता भरणे, गोपीचंद पडळकर आणि इतर नेत्यांचा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा सोहळा होत आहे. पहलगामच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या चितेची राख विझलेली नाही. या नागरिकांच्या घरी आजही दुःखाचे वातावरण आहे, ते अजून या धक्क्यातून सावरले नाहीत. परंतु भाजपा नेते मात्र हार तुरे घेत आहेत, हीच भाजपाची संस्कृती आहे का? राम शिंदे हे संवैधानिक पदावर आहेत. या नेत्यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा तरी विचार करायला हवा होता. दुसऱ्याच्या घरी दुःख आहे, त्याचे या भाजपा नेत्यांना काहीच देणेघेणे नाही, असेही अतुल लोंढे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आरोग्य मंत्रालय कर्मचारीही कामावर आरोग्य मंत्रालय कर्मचारीही कामावर
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातील कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुट्टय़ा पुढील आदेश मिळेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. निर्धारित सुट्टय़ाही...
जनाबाई तारे यांचे निधन
चिनाब नदीवरील चार जलविद्युत प्रकल्पांच्या कामांना वेग
सिंधू जल कराराबाबत हस्तक्षेप करण्यास जागतिक बँकेचा नकार; पाकिस्तानची विनंती फेटाळली
India Pakistan War पाकिस्तानने केलेले तुर्कीच्या 400 ड्रोनचे हल्ले हाणून पाडले, प्रवासी विमानांची ढाल करून हल्ले
युद्ध परिस्थितीला पाकिस्तानच जबाबदार
लष्करप्रमुखांना तीन वर्षांसाठी सर्वाधिकार, संरक्षण मंत्रालयाची अधिसूचना