Operation Sindoor पार्श्वभूमीवर देशभरामध्ये 26 विमानतळं बंद, दिल्लीमधील 90 उड्डाणे केली रद्द

Operation Sindoor पार्श्वभूमीवर देशभरामध्ये 26 विमानतळं बंद, दिल्लीमधील 90 उड्डाणे केली रद्द

सध्याच्या घडीला हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील एकूणच तणावाची स्थिती पाहता विमानसेवा बंद करण्यात आलेल्या आहेत. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हिंदुस्थानी सशस्त्र दलांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून बुधवारी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. या हल्ल्यात 26 हून अधिक लोक मारले गेले होते, त्यानंतर विमानतळ बंदी आणि उड्डाण रद्दीकरणाची मालिका सुरू झाली आहे.

यामध्ये देशभरातील तब्बल 26 विमानतळांवर नागरी विमान वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. यामुळे बहुतांशी विमान कंपन्यांनी आता प्रवाशांसाठी नवीन नियमावली लागू केलेली आहे. इतकेच नाही तर आता एअर इंडियाने प्रवाशांसाठी नियमावली जाहीर केलेली आहे. या नियमावली अंतर्गत उड्डाणाच्या वेळेच्या किमान तीन तास आधी पोहोचण्याचे आवाहन एअर इंडियाकडून करण्यात आलेले आहे. नागरी उड्डयन सुरक्षा ब्युरो यांच्याकडून राबवण्यात येणाऱ्या सुरक्षा उपाययोजनांमुळे चेक-इन प्रक्रिया उड्डाणाच्या 75 मिनिटांपूर्वी बंद करण्यात येणार असल्याचे, एअर इंडियाने म्हटले आहे.

देशभरामध्ये सध्याच्या घडीला इंडिगो या विमान कंपनीने 10 मे सकाळपर्यंत 165 पेक्षा अधिक फेऱ्या रद्द केल्या आहेत. तर स्पाईसजेटने धर्मशाला, लेह, जम्मू, श्रीनगर आणि अमृतसर यासह उत्तर भारतातील उड्डाणे रद्द केली आहेत. ही रद्द झालेली उड्डाणे पुढील आदेशापर्यंत रद्द राहणार आहेत. सध्याच्या घडीला देशातील एकूण वातावरण पाहता, राजधानी दिल्लीमधील विमानतळावर 90 उड्डाणे रद्द करण्यात केली आहेत. यामध्ये 5 आंतरराष्ट्रीय उड्डाणांचाही समावेश करण्यात आलेला आहे.

खालील 26 विमानतळांवर सध्या नागरी उड्डाण सेवा बंद आहे. 

चंदीगड, श्रीनगर, अमृतसर, लुधियाना, भुंतर, किशनगड, पाटियाला, शिमला, कांगडा-गग्गल, बठिंडा, जैसलमेर, जोधपूर, बीकानेर, हलवारा, पठानकोट, जम्मू, लेह, मुंद्रा, जामनगर, हीरासर, पोरबंदर, केशोद, कांडला, भुज, हिंडन, शिमला

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

2030 पर्यंत माणूस खरच अमर होणार? काय आहे गूगलच्या माजी शास्त्रज्ञाचा दावा 2030 पर्यंत माणूस खरच अमर होणार? काय आहे गूगलच्या माजी शास्त्रज्ञाचा दावा
गूगलचे माजी शास्त्रज्ञ आणि प्रसिद्ध भविष्यवक्ता रे कुर्जवील यांनी सनसनाटी दावा केला आहे. 2030 पर्यंत नैनोरोबोट्सच्या मदतीने माणूस अमर होईल,...
छगन भुजबळ मंगळवारी घेणार मंत्रिपदाची शपथ, अन्न व नागरी पुरवठा खात्याची मिळणार जबाबदारी?
IPL 2025 – अभिषेक शर्माच वादळ पुन्हा एकदा गोंगावलं, हैदराबादने लखनऊला नमवलं; 6 विकेटने केला पराभव
‘धादांत खोट्या बातम्या दिल्या गेल्या…’, ऑपरेशन सिंदूरबाबत पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?
सरन्यायाधीशांच्या अवमानास कोण जबाबदार? याची चौकशी करून कारवाई करावी; रोहित पवार यांची मागणी
Latur News – लातूर बार्शी रोडवर ट्रॅक्टर आणि रिक्षाचा भीषण अपघात, 3 ठार; 3 गंभीर जखमी
India Tour of England – टीम इंडियाविरुद्ध दमदार कामगिरी करण्यासाठी अष्टपैलू खेळाडू सज्ज, दारू सोडल्याची केली मोठी घोषणा