India Pakistan War – कश्मीरमध्ये लष्कराचे दोन जवान शहीद, मुंबईतील घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण

India Pakistan War – कश्मीरमध्ये लष्कराचे दोन जवान शहीद, मुंबईतील घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण

कश्मीरमध्ये सीमेवर पाकिस्तानच्या हल्ल्यात हिंदुस्थानचे दोन जवान शहीद झाले आहेत. त्यातील एक जवान मुरली नाईक हे मुंबईतील घाटकोपरचे रहिवासी होते. कश्मीरमध्ये पाकड्यांशी लढताना आज पहाटे 3 वाजता मुरली नाईक यांना वीरमरण आले.

Operation Sindoor – सुरक्षा दलांच्या हालचालींचे लाईव्ह कव्हरेज टाळा, केंद्र सरकारच्या माध्यमांना सूचना

सीमेवरील पाकिस्तानच्या हल्ल्याला हिंदुस्थानच्या लष्कराकडूनही चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. पाकच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना हिंदुस्थानच्या लष्कराचे दोन जवान शहीद झाले. त्यात मुंबईत घाटकोपरमध्ये राहणारे आणि मूळच्या आंध्र प्रदेशचे असलेल्या मुरली नाईक यांना वीरमरण आले आहे. तर दुसरे जवान दिनेश शर्मा आहेत. पाकच्या गोळीबारात जखमी झालेल्या शर्मा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पूंछ सेक्टरमध्ये ते जखमी झाले होते.

हिंदुस्थान-पाकिस्तान तणावादरम्यान, जम्मू-उधमपूर ते दिल्लीसाठी तात्काळ 3 विशेष गाड्या धावणार

शहीद झालेले मुरली श्रीराम नाईक हे घाटकोपरच्या कामराज नगरमध्ये राहत होते. मूळचे आंध्र प्रदेशचे रहिवासी असलेले नाईक कुटुंब हे कामराज नगरच्या झोपडपट्टीमध्ये राहत होते. काही दिवसांपूर्वी सदरची झोपडपट्टी पुनर्विकासात गेल्याने त्यांची घरे तोडण्यात आली होती. त्यामुळे सध्या नाईक यांचे कुटुंब आंध्र प्रदेशाला आपल्या गावी राहण्यास गेले आहे. मुंबईतील घाटकोपरच्या वार्ड क्रमांक 133 मध्ये मुरली नाईक यांचे शहीद झाल्याचे बॅनर लावण्यात आले. स्थानिकांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

2030 पर्यंत माणूस खरच अमर होणार? काय आहे गूगलच्या माजी शास्त्रज्ञाचा दावा 2030 पर्यंत माणूस खरच अमर होणार? काय आहे गूगलच्या माजी शास्त्रज्ञाचा दावा
गूगलचे माजी शास्त्रज्ञ आणि प्रसिद्ध भविष्यवक्ता रे कुर्जवील यांनी सनसनाटी दावा केला आहे. 2030 पर्यंत नैनोरोबोट्सच्या मदतीने माणूस अमर होईल,...
छगन भुजबळ मंगळवारी घेणार मंत्रिपदाची शपथ, अन्न व नागरी पुरवठा खात्याची मिळणार जबाबदारी?
IPL 2025 – अभिषेक शर्माच वादळ पुन्हा एकदा गोंगावलं, हैदराबादने लखनऊला नमवलं; 6 विकेटने केला पराभव
‘धादांत खोट्या बातम्या दिल्या गेल्या…’, ऑपरेशन सिंदूरबाबत पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?
सरन्यायाधीशांच्या अवमानास कोण जबाबदार? याची चौकशी करून कारवाई करावी; रोहित पवार यांची मागणी
Latur News – लातूर बार्शी रोडवर ट्रॅक्टर आणि रिक्षाचा भीषण अपघात, 3 ठार; 3 गंभीर जखमी
India Tour of England – टीम इंडियाविरुद्ध दमदार कामगिरी करण्यासाठी अष्टपैलू खेळाडू सज्ज, दारू सोडल्याची केली मोठी घोषणा