Operation Sindoor- हिंदुस्थानने पाकिस्तानची नष्ट केलेली AWACS प्रणाली काय आहे ते समजून घ्या

Operation Sindoor- हिंदुस्थानने पाकिस्तानची नष्ट केलेली AWACS प्रणाली काय आहे ते समजून घ्या

हिंदुस्थानने पाकिस्तानला गुरुवारी रात्री केलेल्या हल्ल्यात त्यांच्याच भाषेत योग्य उत्तर दिले. जम्मू, पठाणकोट, उधमपूर आणि इतर काही ठिकाणी लष्करी तळांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानी सैन्याचा प्रयत्न, तिन्ही सैन्यदलांनी एकत्रितपणे हाणून पाडला आहे. पाकिस्तानच्या पंजाबमध्ये एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम (AWACS) विमानही पाडले. या एकाच मोठ्या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या हवाई देखरेख आणि युद्धभूमीच्या क्षमतेला मोठा धक्का बसला आहे. इस्लामाबादच्या AWACS विमानाच्या विध्वंसामुळे पाकिस्तानवर नेमका कसा आणि काय परिणाम झालाय तो आपण समजून घेऊया.

सर्वात आधी AWACS विमाने काय करतात हे समजून घेऊया.

अलिकडच्या काळात जेव्हा एखाद्या देशाच्या लष्करी सामर्थ्याची चर्चा होते तेव्हा ड्रोन, बॉम्ब आणि क्षेपणास्त्रे बातम्यांच्या मथळ्यांमध्ये वर्चस्व गाजवतात. परंतु यापैकी, AWACS विमान देशाच्या हवाई दलासाठी चक्षु म्हणून काम करते.

AWACS प्रणाली रिअल टाइममध्ये देखरेख करतात आणि कोणत्याही लष्करी कारवाई दरम्यान समन्वयासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. हवेत तरंगत असताना, ते लष्कर, नौदल आणि हवाई दलाला देशात पुढे काय चालले आहे आणि हल्ला कुठे केला जाऊ शकतो हे सांगते. हवेतून हवेत युद्ध करण्यासाठी आणि आपल्या आकाशाचे रक्षण करण्यासाठी AWACS प्रणाली खूप महत्त्वाची आहे. त्याच्या मदतीने पाकिस्तान भारताच्या हवाई हल्ल्यांवर लक्ष ठेवतो आणि आपल्या हवाई दलाला मार्गदर्शन करतो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

देश- विदेश – 17 फेब्रुवारीला पहिले सूर्यग्रहण देश- विदेश – 17 फेब्रुवारीला पहिले सूर्यग्रहण
2026 मधील पहिले सूर्यग्रहण 16 फेब्रुवारीला मंगळवारी होईल, परंतु हे सूर्यग्रहण हिंदुस्थानात दिसणार नाही. हे सूर्यग्रहण एक वर्तुळात म्हणजेच रिंग...
उद्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 6तास बंद राहणार
मिंध्यांच्या मंत्र्यांचा कॅबिनेटवर बहिष्कार; भाजपकडून राजकीय आणि आर्थिक नाकाबंदीमुळे घुसमट – स्फोट करण्याचा इशारा, फडणवीसांनी शिंदेंसमोरच मंत्र्यांना उडवून लावले
परत कुणीतरी गावाला जाणार, आदित्य ठाकरे यांनी डिवचले
पार्थ पवारांचे नावच नाही… क्लीन चिट! मुंढवा जमीन घोटाळ्याचा चौकशी अहवाल आला
शिक्षकांच्या बदल्या 30 मेनंतर नकोत, हायकोर्टाचे आदेश; 53 वर्षे पूर्ण झालेल्यांना दुर्गम भागात बदली नाही
मुंबईत परवडणाऱ्या घरांची घोषणा, निवडणुकीसाठी महायुतीचे गाजर