India Pakistan War पूँछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

India Pakistan War पूँछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

ऑपरेशन सिंधू अंतर्गत पाकिस्तान व पीओकेमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर दुसऱ्या दिवशी हिंदुस्थान थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपर्यंत पोहोचला. इस्लामाबाद, लाहोर, कराची, पेशावर सारख्या महत्त्वाच्या शहरांवर हिंदुस्थानने हल्ले केल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने जम्मू कश्मीरच्या सीमा भागात तुफान गोळीबार व उखळी तोफांचा मारा केला. या गोळीबारात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

एक जवान शहीद

कश्मीरमध्ये सीमेवर पाकिस्तानच्या गोळीबारात मुरली नाईक हे मुंबईतील घाटकोपरचे जवान शहीद झाले आहेत. कश्मीरमध्ये उरी येथे पाकड्यांशी लढताना आज पहाटे 3.30 वाजता मुरली नाईक यांना वीरमरण आले.

हिंदुस्थानने पाकिस्तानची AWACS प्रणाली नष्ट केली

हिंदुस्थानने गुरुवारी रात्री पाकिस्तानची एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम AWACS प्रणाली नष्ट केली. यामुळे पाकिस्तानी लष्कराचे मोठे नुकसान झाले आहे. हिंदुस्थानने गुरुवारी पाकड्यांची पाच लढाऊ विमानेही पाडली.

सुरक्षा दलांच्या हालचालींचे लाईव्ह कव्हरेज टाळा – केंद्रांचे आदेश

हिंदुस्थान-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व माध्यम चॅनेल, डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सुरक्षा दलांच्या कारवाया आणि जवानांच्या हालचालींचे थेट कव्हरेज किंवा लाईव्ह रिपोर्टिंग टाळा, अशा सूचना केंद्राने माध्यमांना दिल्या आहेत. याबाबत एक पत्रक जारी करण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी आणि शुक्रवारीही अनेक चॅनेल्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्म युजर्सने मोठ्या प्रमाणात चुकीची माहिती प्रसारित केली. त्यामुळे ही सूचना जारी करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोखाड्याजवळ एसटीला अपघात; 25 जखमी, श्रीघाटातील अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटला मोखाड्याजवळ एसटीला अपघात; 25 जखमी, श्रीघाटातील अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटला
जव्हारमध्ये एसटीचा भीषण अपघात होऊन ४० जण जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच आज सकाळी पुन्हा श्रीघाटात असाच भयंकर अपघात घडला....
ठाणे, पालघर, रायगडमध्ये उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन; 15 नगर परिषदा, 1 नगरपंचायतसाठी 2800 अर्ज दाखल
सोनाक्षी सिन्हाने 30 किलो वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय निवडला, वाचा
Thane news – कोपरीत समाजकंटकांचा ‘रात्रीस खेळ चाले’, नऊ दुचाकी पेटवल्या
आशिका मृत्यूप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती, शिक्षण विभाग दोषींवर कठोर कारवाई करणार
ऑनलाइन डेटिंगमुळे तरुणींचा कॉस्मेटिक सर्जरीकडे वाढता कल
Mumbai news – मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, विक्रोळी ते कांजुरमार्ग दरम्यान रेल्वे रुळाचा तडे