भिकेचा कटोरा घेतलेल्या पाकड्यांना IMF दणका देणार; आज महत्त्वाची बैठक

भिकेचा कटोरा घेतलेल्या पाकड्यांना IMF दणका देणार; आज महत्त्वाची बैठक

हिंदुस्थानच्या ऑपरेशन सिंदूरमुळे रसातळाला गेलेल्या पाकिस्तानती युद्ध करण्याऱ्या खुमखुमी काही जात नाही. हिंदुस्थानने हवाई हल्ला करणाऱ्या पाकिस्तानचे जवळपास 50 ड्रोन आणि क्षेपणास्त्र नेस्तनाबूत केले. तसेच अंदाजे 100 हून अधिक दहशतवादी ठार केले. अशा परिस्थितीत पाकड्यांकडे आता पुढील 2 ते 3 दिवस जातील एवढेच शस्त्रसाठी उरला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानवर भीक मागण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानच्या अर्थखात्याने जगभरातील मित्र राष्ट्रांकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे.

हिंदुस्थानशी युद्धाची दर्पोक्ती करणे पाकिस्तानला महागात पडले आहे. हिंदुस्थानने पाकिस्तानला सळो की पळो करून सोडले आहे. हिंदुस्थान पहिल्या दिवसापासूनच पाकिस्तानविरोधात कठोर निर्णय घेत आहे. अशातच गुरूवारी हिंदुस्थानने पाकिस्तानवर तिसरा वॉटर स्ट्राईक केला असून चिनाब नदीवर बांधलेल्या रियासी येथील सलाल आणि बगलिहार धरणाचे दरवाजे आज उघडले. त्यामुळे पाकव्याक्त कश्मीरवर पुराचे संकट घोंघावत आहे. त्यामुळे शहरांमध्ये दहशत निर्माण झाली. हिंदुस्थानच्या कारवाईच्या भीतीमुळे पाकिस्तानी शेअर बाजारही घाबरला आहे.

गरिबीमुळे भीकेला लागलेल्या शाहबाज शरीफ सरकारने पुन्हा एकदा चीनकडून आयएमएफकडे आर्थिक मदतीची याचना केली. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या कार्यकारी मंडळाची आजच 9 मे रोजी एक महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यात पाकिस्तानला आर्थिक मदत देण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो . पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून 1.3 अब्ज डॉलर्स 36,550 कोटी रुपयांची मदत मागितली आहे. त्यामुळे य़ा बैठकीत पाकड्यांची मागणीवर काय निर्णय होईल याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हिवाळ्यात गूळ अन् चणे खाल्ल्यास काय होते? याचे 5 फायदे जाणून थक्क व्हालं हिवाळ्यात गूळ अन् चणे खाल्ल्यास काय होते? याचे 5 फायदे जाणून थक्क व्हालं
हिवाळा ऋतू सुरु झाला की शरीराला अधिक ऊर्जा आणि ऊबदारतेची गरज असते. या ऋतूत सगळ्यात जास्त गरज असते ती योग्य...
आमच्याच राज्यात, आमच्याच दैवताचा सन्मान नाही करायचा तर कोणाचा करायचा? आदित्य ठाकरे यांचा सवाल
भरधाव कार वरातीत घुसली, तिघांचा मृत्यू; 16 जण गंभीर जखमी
चेहऱ्यावर नारळ तेल लावण्याचे भरमसाठ फायदे, वाचा
दिल्ली आणि NCR मध्ये बांधकाम कामांवर बंदी नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
भाजपचं हिंदुत्व बेगडी, शिवसेनेचं हिंदुत्व व्यापक; पालघर प्रकरणावरून अंबादास दानवेंनी सुनावले
माझं म्हणणं न ऐकताच झालेला निर्णय एकतर्फी, शिक्षा सुनावल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया