युद्ध परिस्थितीला पाकिस्तानच जबाबदार

युद्ध परिस्थितीला पाकिस्तानच जबाबदार

भारताच्या सीमेवर पाकिस्तानने केलेल्या आगळीकीमुळे युद्धजन्य परिस्थिती ओढवली आहे. भारतातील दहशतवादी कारवायांशी आमचा काही संबंध नाही, हे किती जरी पाकिस्तान सरकारने सांगितले तरी दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला पाकिस्तान सरकारच्या प्रतिनिधींची उपस्थिती यातून सर्व काही स्पष्ट होते, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

युद्ध ही आपली निवड नाही, हे अनेक वेळा देशाच्या पंतप्रधानांसह अनेकांनी स्पष्टपणे सांगितले आहे, पण जर आपल्यावर हल्ला झाला तर आपल्या रक्षणासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे असते आणि आज तीच खबरदारी घेतली जात आहे. आज आपला देश एका वेगळय़ा स्थितीतून जात आहोत. त्या स्थितीला सामोरे जाण्यासाठी मतभेद बाजूला ठेवून एक सशक्त भारत उभा करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे शरद पवार सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

भारताने कधीही दहशतवादी चळवळीला प्रोत्साहन दिलेले नाही. आपल्या देशातील लोक हे शांततेचा पुरस्कार करणारे आहेत. सीमेवर जे काही घडत आहे त्यामागे पाकिस्तानातील सत्ताधारीच आहेत.

सैन्याच्या कामगिरीचा अभिमान
सैन्यदलाची कामगिरी पाहून अभिमान वाटतो. आता सैन्यदल महिलांच्याही हाती आहे. संरक्षण मंत्री असताना संरक्षण खात्यामध्ये नऊ टक्के महिलांची भरती व्हावी असा निर्णय आम्ही घेतला होता. त्याचाच परिणाम म्हणून आज महिला ब्रिगेड लष्करात अत्यंत मानाने उभी आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या मुख्य कर्नल सोफिया पुरेशी यांच्या धाडसाचा पवार यांनी उल्लेख केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वेलचीचे नव्हे तर त्याच्या पानांचे देखील असंख्य फायदे आहेत…. जाणून घ्या वेलचीचे नव्हे तर त्याच्या पानांचे देखील असंख्य फायदे आहेत…. जाणून घ्या
भारतीय जेवणामध्ये भरपूर प्रमाणात मसाल्यांचा वापर केला जातो. मसाल्यांच्या सेवनामुळे तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात. वेलची ही एक अशी गोष्ट...
न्यूमोनियामुळे फुप्फुसांचाच नाही तर सांधेदुखीचा त्रास सुद्धा होतो का?
सरकारने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची चेष्टा करणं बंद करावं, रोहित पवार यांनी सुनावले
आपल्या किचनमध्ये दडलेत पित्तावरील रामबाण उपाय, जाणून घ्या
Delhi Bombblast बाबरीचा घ्यायचा होता बदला, सहा डिंसेंबर सहा ठिकाणं… असा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
Photo – आता मालिकांमध्येही प्री वेडिंग शूट, पाहा सखी-कान्हाचं फोटोशूट
पॅनिक अटॅक आणि थरकाप; शोएब मलिकसोबत घटस्फोट झाल्यानंतर सानिया मिर्झाची झालेली वाईट अवस्था