एक रुपयात पीक विमा बंद; आता शेतकऱ्यांना पैसे भरावे लागणार

एक रुपयात पीक विमा बंद; आता शेतकऱ्यांना पैसे भरावे लागणार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱयांना एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारने ती बंद करून सुधारित योजना लागू केली आहे. त्यानुसार अन्नदात्या शेतकऱयांना आता एक रुपयात पीक विमा मिळणार नाही. पीक विम्यासाठी त्यांना खरीप हंगामात 2 टक्के, रब्बीसाठी 1.5 टक्के योगदान आणि नगदी पिकांच्या विमा योजनेसाठी 5 टक्के योगदान द्यावे लागणार आहे.

सुधारित पीक विमा योजनेसंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला. पीक विम्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रत्येक हंगामासाठी ठरावीक योगदान घेतले जाईल आणि उर्वरित पीक हप्ता केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे. पीक कापणी प्रयोगांवर आधारित ही ‘सुधारित पीक विमा योजना’ असणार आहे.

या आपत्तीत मिळणार विमा

वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ आणि त्यामुळे लागलेली नैसर्गिक आग, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, अतिवृष्टी, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पादनात येणारी घट.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शिवसेना पक्षाची चिपळूण नगरपरिषद निवडणूक मोहीम वेगात, विनायक राऊत यांनी घेतला तयारीचा आढावा शिवसेना पक्षाची चिपळूण नगरपरिषद निवडणूक मोहीम वेगात, विनायक राऊत यांनी घेतला तयारीचा आढावा
रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी खासदार तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व सचिव विनायक राऊत यांनी...
आरक्षण वर्गीकरणाबाबतचा प्रश्न विचारताच अजित पवारांची भंबेरी, घोषणांमुळे सभेत गोंधळ
हिंदुस्थानच्या लेकींची कमाल, सलग दुसऱ्यांदा जिंकला कबड्डी विश्वचषक
PHOTO – मतदार यादीतील गोंधळ तातडीने दूर करा, आदित्य ठाकरे यांनी घेतली निवडणूक आयुक्तांची भेट
धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद, आदित्य ठाकरे यांनी वाहिली श्रद्धांजली
IND Vs SA 2nd Test – मार्को यान्सनचा भेदक मारा अन् 15 वर्षांनी घडला नवा विक्रम; टीम इंडिया बॅकफुटवर
उत्तम आरोग्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी कोणते पाणी प्यायला हवे, वाचा