एक रुपयात पीक विमा बंद; आता शेतकऱ्यांना पैसे भरावे लागणार

एक रुपयात पीक विमा बंद; आता शेतकऱ्यांना पैसे भरावे लागणार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱयांना एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारने ती बंद करून सुधारित योजना लागू केली आहे. त्यानुसार अन्नदात्या शेतकऱयांना आता एक रुपयात पीक विमा मिळणार नाही. पीक विम्यासाठी त्यांना खरीप हंगामात 2 टक्के, रब्बीसाठी 1.5 टक्के योगदान आणि नगदी पिकांच्या विमा योजनेसाठी 5 टक्के योगदान द्यावे लागणार आहे.

सुधारित पीक विमा योजनेसंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला. पीक विम्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रत्येक हंगामासाठी ठरावीक योगदान घेतले जाईल आणि उर्वरित पीक हप्ता केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे. पीक कापणी प्रयोगांवर आधारित ही ‘सुधारित पीक विमा योजना’ असणार आहे.

या आपत्तीत मिळणार विमा

वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ आणि त्यामुळे लागलेली नैसर्गिक आग, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, अतिवृष्टी, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पादनात येणारी घट.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Nanded News  भाजपची घराणेशाही! एकाच कुटुंबातील सहा जणांना दिली उमेदवारी Nanded News भाजपची घराणेशाही! एकाच कुटुंबातील सहा जणांना दिली उमेदवारी
>> विजय जोशी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते भारतीय जनता पक्षात घराणेशाही चालत नाही असे छातीठोकपणे जाहीरपणे सांगतात, मात्र नांदेड...
जमिनीवर बसून जेवण करण्याचे काय फायदे आहेत?
तैवानवर लष्करी कारवाई केली तर आम्ही…; जपानचा चीनला थेट इशारा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील 50 टक्के आरक्षण मर्यादेवरून वाद, सुनावणी मंगळवारपर्यंत तहकूब
पुण्यात हॉटेल कपिलाजवळ स्लॅब कोसळला, दोन जण ढिगाऱ्याखाली अडकले
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत ‘हॉक फोर्स’चे इन्स्पेक्टर शहीद
मतचोरी तर सोडाच पक्षाचे बी फॉर्मसुद्धा चोरले, शिवसेनेचा हल्लाबोल; डमी उमेदवार आणि राहतामधील अर्जांचा निवडणूक आयोगाचा घोळ आणला चव्हाट्यावर