एक रुपयात पीक विमा बंद; आता शेतकऱ्यांना पैसे भरावे लागणार

एक रुपयात पीक विमा बंद; आता शेतकऱ्यांना पैसे भरावे लागणार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱयांना एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारने ती बंद करून सुधारित योजना लागू केली आहे. त्यानुसार अन्नदात्या शेतकऱयांना आता एक रुपयात पीक विमा मिळणार नाही. पीक विम्यासाठी त्यांना खरीप हंगामात 2 टक्के, रब्बीसाठी 1.5 टक्के योगदान आणि नगदी पिकांच्या विमा योजनेसाठी 5 टक्के योगदान द्यावे लागणार आहे.

सुधारित पीक विमा योजनेसंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला. पीक विम्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रत्येक हंगामासाठी ठरावीक योगदान घेतले जाईल आणि उर्वरित पीक हप्ता केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे. पीक कापणी प्रयोगांवर आधारित ही ‘सुधारित पीक विमा योजना’ असणार आहे.

या आपत्तीत मिळणार विमा

वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ आणि त्यामुळे लागलेली नैसर्गिक आग, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, अतिवृष्टी, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पादनात येणारी घट.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हिवाळ्यात तुम्ही कधी खजूरगुळाच्या पाकातील रसगुल्ला खाल्ला आहे का? जाणून घ्या झटपट रेसिपी हिवाळ्यात तुम्ही कधी खजूरगुळाच्या पाकातील रसगुल्ला खाल्ला आहे का? जाणून घ्या झटपट रेसिपी
हिवाळा सुरू झाल्यावर आपल्या शरीराला उबदारपणा आणि थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी आहारात अनेक वेगवेगळे पदार्थ समाविष्ट करत असतो. तसेच थंडीच्या...
पांढरा राइस की ब्राऊन राइस… डायबिटीजचे रुग्ण कोणता भात खाऊ शकतात? अन् कोणत्या भातामुळे शुगर वाढू शकते?
90 टक्के लोकांना माहिती नाही, शरीराच्या कोणत्या भागाला थंडी जास्त वाजते? जाणून घ्या
हिवाळ्यात रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी ‘या’ पदार्थांचे करा सेवन
चेन्नईजवळ हिंदुस्थानी हवाई दलाचं विमान कोसळलं, प्रशिक्षण उड्डाणादरम्यान झाला अपघात
वैभव सूर्यवंशीची आग ओकणारी फलंदाजी! 32 चेंडूत ठोकलं शतक, पाकिस्तानची धडधड वाढली
बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग व ज्ञानेश कुमारांचे, मतचोरी व SIR मुळे एनडीएचा विजय – हर्षवर्धन सपकाळ