एक रुपयात पीक विमा बंद; आता शेतकऱ्यांना पैसे भरावे लागणार

एक रुपयात पीक विमा बंद; आता शेतकऱ्यांना पैसे भरावे लागणार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱयांना एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारने ती बंद करून सुधारित योजना लागू केली आहे. त्यानुसार अन्नदात्या शेतकऱयांना आता एक रुपयात पीक विमा मिळणार नाही. पीक विम्यासाठी त्यांना खरीप हंगामात 2 टक्के, रब्बीसाठी 1.5 टक्के योगदान आणि नगदी पिकांच्या विमा योजनेसाठी 5 टक्के योगदान द्यावे लागणार आहे.

सुधारित पीक विमा योजनेसंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला. पीक विम्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रत्येक हंगामासाठी ठरावीक योगदान घेतले जाईल आणि उर्वरित पीक हप्ता केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे. पीक कापणी प्रयोगांवर आधारित ही ‘सुधारित पीक विमा योजना’ असणार आहे.

या आपत्तीत मिळणार विमा

वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ आणि त्यामुळे लागलेली नैसर्गिक आग, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, अतिवृष्टी, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पादनात येणारी घट.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रत्नागिरीत महायुती फुटली! अजित पवार गटाचे नगराध्यक्षपदासह स्वतंत्र उमेदवार रत्नागिरीत महायुती फुटली! अजित पवार गटाचे नगराध्यक्षपदासह स्वतंत्र उमेदवार
रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत महायुती फुटल्याची घटना घडली आहे. महायुतीतील घटक अजित पवार गटाने नगराध्यक्षपदासह काही नगरसेवकपदासाठी अर्ज भरल्याने महायुतीत...
थायरॉईडच्या समस्येत कोणती योगासने फायद्याची ? रामदेव बाबांचा सल्ला काय ?
दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एक अटक, NIAने दहशतवादी उमरच्या आणखी एका साथीदाराला ठोकल्या बेड्या
Sindhudurg News – कणकवली भाजपाविरुद्ध क्रांतिकारी विचार पक्षामध्ये लढत, नगरपंचायतसाठी 62 जणांचे अर्ज दाखल
Ratnagiri News – नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून शिवानी सावंत-माने यांचा उमेदवारी अर्ज
उमराह यात्रेच्या परतीच्या प्रवासात काळाचा घाला; हैदराबादच्या कुटुंबातील तीन पिढ्यांतील 18 जणांचा मृत्यू
रत्नागिरीच्या राजकारणात 21 वर्षांपासून लबाड लांडगा, उदय सामंतांनी 44 कोटींच्या डांबराचे चलन दाखवावे; बाळ माने यांचे आव्हान