India Pakistan War मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षा वाढवली

India Pakistan War मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षा वाढवली

सध्याच्या घडीला हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये असलेल्या, तणावपूर्ण परिस्थितीमुळे देशामध्ये सर्व महत्त्वाच्या ठिकाणांना  हायअलर्ट लागू करण्यात आलेला आहे. ऑपरेशन सिंदूर च्या पाश्वभूमीवर पाकिस्तानी सैन्य हिंदूस्थानच्या नागरी वस्त्यांवर हल्ले चढवत आहे. या हल्ल्यांमध्ये रॉकेट लाँचर्स, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर केला जात असल्याने, मुंबईच्या किनारपट्टीवर पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे.

हिंदुस्थानी सैन्याने गुरुवारी रात्रभरात पाकिस्तानला रात्रभर मोठा दणका दिला आहे. थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपर्यंत धडक मारत जोरदार ड्रोन आणि हवाई हल्ले केले. हिंदुस्थान-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षा वाढवली आहे. समुद्रकिनारी फिरायला आलेल्या, किनाऱ्यावर बसलेल्या लोकांना त्वरित समुद्रकिनाऱ्यावरून उठून जाण्यास सांगितले जात आहे. तसेच सर्वांना सुरक्षेचं कारण देऊन समुद्रकिनाऱ्यापासून दूर जाण्यास सांगितलं जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Heart Attack: हार्ट अटॅक टाळण्यासाठी दररोज किती वेळ चालायला हवं? Heart Attack: हार्ट अटॅक टाळण्यासाठी दररोज किती वेळ चालायला हवं?
दररोज व्यायाम करणे हे हृदयाच्या आरोद्यासाठी खूप फायदेशीर आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी दररोज किती वेळ...
रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन प्रवाशांच्या जीवावर, लोकलच्या धडकेत चौघांचा मृत्यू
Pune News – पुण्यातील माजी नगरसेविका प्राची आल्हाट यांच्यासह पतीवर गुन्हा दाखल; डॉक्टरांची २४ लाखांची फसवणूक
Photo – मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प, कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
Ratnagiri News – रत्नागिरी शहरात ६४ हजार ७४६ मतदार आपला हक्क बजावणार, ६९ मतदान केंद्रांवर होणार मतदान
माझा दुरान्वयेही संबंध नाही, मुख्यमंत्र्यांनी जरूर चौकशी करावी; पार्थ पवारांवरील जमीन घोटाळ्याच्या आरोपांवर अजित पवारांची प्रतिक्रिया
मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प, सीएसएमटी स्थानकावर सर्व लोकल ट्रेन उभ्या; कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे वाहतूक कोलमडली