गॅसगळतीमुळे दोन लहान मुलांसह तिघांचा मृत्यू, दोघांची प्रकृती अत्यवस्थ

गॅसगळतीमुळे दोन लहान मुलांसह तिघांचा मृत्यू, दोघांची प्रकृती अत्यवस्थ

सोलापुरात गॅसगळतीमुळे एकाच कुटुंबातील दोन लहान मुलांसह तिघांचा मृत्यू झाला असून, दोघांची प्रकृती अत्यवस्थ आहे. हर्ष बलरामवाले, अक्षय बलरामवाले, विमल मोहनसिंह बलरामवाले अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर, युवराज मोहनसिंह बलरामवाले व रंजना युवराज बलरामवाले यांची प्रकृती अत्यवस्थ आहे.

याबाबत माहिती अशी की, लष्कर परिसरातील नळ बाजार येथे राहणारे बलरामवाले हे एका खोलीत कुटुंबीयांसह राहतात. रात्रीच्या सुमारास पत्नी रंजना, मुले हर्ष (वय 6), अक्षय (वय 4), आई विमल (वय 60) हे सर्वजण जेवण करून झोपले होते. सकाळी 11 वाजेपर्यंत युवराज बलरामवाले यांचे कुटुंबीय बाहेर न आल्याने शेजाऱ्यांनी घराचे पत्रे उचकडून आत पाहिजले असता पाचही जण बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे दिसून आले. प्रत्येकाच्या तोंडाला फेस येत असल्याने तातडीने उपचारासाठी सर्वांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान हर्ष, अक्षय व त्यांची आजी विमल यांचा मृत्यू झाला. तर युवराज बलरामवाले व पत्नी रंजना यांच्यावर उपचार चालू असून प्रकृत्ती चिंत्ताजनक आहे.

प्राथमिक तपासात रात्रीच्या वेळेच्या स्वयंपाकाची गॅस शेगडी व्यवस्थित बंद न केल्याने गॅस लिकेज झाला व गुदमरून पाचजण बेशुद्ध पडले होते. गॅस श्वसनाद्वारे शरीरात गेल्यामुळे फुफ्फुसांना इजा झाल्याचे सांगण्यात येत असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सदर बाझार पोलिस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महायुती सरकारकडून कर्जमाफीचे गाजर; बळीराजाला फसवले, थकबाकीदार शेतकऱ्यांना वसुलीसाठी कोर्टाची नोटीस ! महायुती सरकारकडून कर्जमाफीचे गाजर; बळीराजाला फसवले, थकबाकीदार शेतकऱ्यांना वसुलीसाठी कोर्टाची नोटीस !
विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेवर येताच महायुती सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांना...
अंगात सिंदूर नव्हे तर अंगात देशभक्ती भिनली पाहिजे, उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदी यांना जोरदार टोला
बाळासाहेब ठाकरेंवर आरोप करणाऱ्या सर्व भाजपच्या लोकांनी औकातीत रहावं, उद्धव ठाकरे यांचा इशारा
Israel Attack On Gaza : इस्रायलचा गाझावर पुन्हा प्रहार, 50 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू
“जय शहा, भाजप मंत्र्यांची मुलं भारत-पाकिस्तान सामना पाहायला जातील, पण प्रखर राष्ट्रभक्त…”, संजय राऊत यांचा हल्लाबोल
राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये येणार महिला राज; 34 पैकी 18 ठिकाणी महिला आरक्षण जाहीर
माकडाची दुचाकीवर झडप अपघातात पती ठार; पत्नी जखमी