खालापुरात अदानीच्या स्मार्ट मीटरला कडाडून विरोध, ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले

खालापुरात अदानीच्या स्मार्ट मीटरला कडाडून विरोध, ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले

अदानी समूहाच्या ठेकेदाराकडून लावण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरला खालापूर तालुक्यातून कडाडून विरोध करण्यात आला आहे. ग्रामस्थांची परवानगी न घेता हे मीटर लावले जात असल्याने घोडीवली-नावंढे परिसरातील नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला आणि हे मीटर लावणे थांबवले नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिला.

खालापूर तालुक्यात वीजग्राहकांच्या माथी महावितरण कंपनीने स्मार्ट मीटर मारण्याचा घाट घातला आहे. हे स्मार्ट मीटर लावण्याचे काम अदानी कंपनीला देण्यात आले आहे. अदानी कंपनीचा ठेकेदार मनमानी कारभार करत ग्राहकांना विश्वासात न घेता परस्पर स्मार्ट मीटर लावत असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. घोडीवली, नावंढे परिसरात काही ग्राहकांच्या घरी परस्पर मीटर लावण्याचे निदर्शनास येताच सर्व ग्राहक आक्रमक झाले. त्यांनी आज महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली आणि स्मार्ट मीटरला विरोध केला. अधिकाऱ्यांना धारेवर धरत कोणत्याही प्रकारे स्मार्ट मीटर लावू नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली. याप्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, सामाजिक कार्यकर्ते किरण हाडप, तुळशीराम पाटील, रामदास फावडे, दिलीप हाडप, नरेश हाडप आदी उपस्थित होते. फॉल्टी मीटरच्या नावाखाली सरसकट स्मार्ट मीटर बसविले जात असतील तर हे खपवून घेणार नाही. जे घरगुती मीटर आहेत ते ग्राहकांच्या परवानगीशिवाय काढू नका, असा इशारा दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महायुती सरकारकडून कर्जमाफीचे गाजर; बळीराजाला फसवले, थकबाकीदार शेतकऱ्यांना वसुलीसाठी कोर्टाची नोटीस ! महायुती सरकारकडून कर्जमाफीचे गाजर; बळीराजाला फसवले, थकबाकीदार शेतकऱ्यांना वसुलीसाठी कोर्टाची नोटीस !
विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेवर येताच महायुती सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांना...
अंगात सिंदूर नव्हे तर अंगात देशभक्ती भिनली पाहिजे, उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदी यांना जोरदार टोला
बाळासाहेब ठाकरेंवर आरोप करणाऱ्या सर्व भाजपच्या लोकांनी औकातीत रहावं, उद्धव ठाकरे यांचा इशारा
Israel Attack On Gaza : इस्रायलचा गाझावर पुन्हा प्रहार, 50 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू
“जय शहा, भाजप मंत्र्यांची मुलं भारत-पाकिस्तान सामना पाहायला जातील, पण प्रखर राष्ट्रभक्त…”, संजय राऊत यांचा हल्लाबोल
राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये येणार महिला राज; 34 पैकी 18 ठिकाणी महिला आरक्षण जाहीर
माकडाची दुचाकीवर झडप अपघातात पती ठार; पत्नी जखमी