गावात कुणबी नोंद न सापडल्याने मराठा तरुणाची आत्महत्या, लातूर जिल्ह्यातील घटना

गावात कुणबी नोंद न सापडल्याने मराठा तरुणाची आत्महत्या, लातूर जिल्ह्यातील घटना

आरक्षणाच्या मागणीसाठी आणि गावात कुणबी नोंदी न मिळाल्याने निराश झालेल्या २७ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना १२ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. अभिजित गोविंद सोळंके (२७, रा. खंडाळी, ता. अहमदपूर, जि. लातूर) असे या मृत तरुणाचे नाव आहे.

अभिजित हा मराठा आरक्षणासाठीच्या विविध आंदोलनांमध्ये सक्रिय होता. त्याला गावामध्ये कुणबी समाजाची कोणतीही नोंद सापडली नाही, त्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून खूप चिंतेत होते. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातही तो सहभागी झाला होता. शासनाकडून सातत्याने होणारी फसवणूक आणि आरक्षणाकडे होणारे दुर्लक्ष यामुळे तो निराश झाला होता.

अहमदपूर शहरात भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या अभिजीतने १२ सप्टेंबर रोजी दुपारी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. त्याच्या आत्महत्येमुळे मराठा समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्याच्या चुलत्यांनी, राहुल मारोती सोळंके यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणाची मागणी आणि गावामध्ये कुणबी नोंदी न सापडल्याने अभिजितने नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलले.

या घटनेची नोंद अहमदपूर पोलीस ठाण्यात करण्यास आली आहे असून, या दुर्दैवी घटनेनंतर मराठा समाजामध्ये शोककळा पसरली असून, सरकारने या प्रकरणी तातडीने लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महायुती सरकारकडून कर्जमाफीचे गाजर; बळीराजाला फसवले, थकबाकीदार शेतकऱ्यांना वसुलीसाठी कोर्टाची नोटीस ! महायुती सरकारकडून कर्जमाफीचे गाजर; बळीराजाला फसवले, थकबाकीदार शेतकऱ्यांना वसुलीसाठी कोर्टाची नोटीस !
विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेवर येताच महायुती सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांना...
अंगात सिंदूर नव्हे तर अंगात देशभक्ती भिनली पाहिजे, उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदी यांना जोरदार टोला
बाळासाहेब ठाकरेंवर आरोप करणाऱ्या सर्व भाजपच्या लोकांनी औकातीत रहावं, उद्धव ठाकरे यांचा इशारा
Israel Attack On Gaza : इस्रायलचा गाझावर पुन्हा प्रहार, 50 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू
“जय शहा, भाजप मंत्र्यांची मुलं भारत-पाकिस्तान सामना पाहायला जातील, पण प्रखर राष्ट्रभक्त…”, संजय राऊत यांचा हल्लाबोल
राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये येणार महिला राज; 34 पैकी 18 ठिकाणी महिला आरक्षण जाहीर
माकडाची दुचाकीवर झडप अपघातात पती ठार; पत्नी जखमी