गारेगार प्रवासाची प्रतीक्षाच! पंतप्रधान योजनेतील 100 टीएमटी बसेस लटकल्या, सप्टेंबर उजाडला तरी तांत्रिक त्रुटी दूर झाल्या नाहीत

गारेगार प्रवासाची प्रतीक्षाच! पंतप्रधान योजनेतील 100 टीएमटी बसेस लटकल्या, सप्टेंबर उजाडला तरी तांत्रिक त्रुटी दूर झाल्या नाहीत

गारेगार टीएमटी बसमधून फिरण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ठाणेकरांच्या पंतप्रधान योजनेतील १०० इलेक्ट्रिक बसेस लटकल्या आहेत. या बसेस वर्षाच्या सुरुवातीला दाखल होणार होत्या. मात्र सप्टेंबर उजाडला तरी बसेस अद्याप आल्या नाहीत. या नवीन इलेक्ट्रिक बसेसमध्ये काही तांत्रिक त्रुटी असल्याने बसेस दाखल होण्यास विलंब होत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. दरम्यान, अजून काही महिने या बसगाड्यांची प्रतीक्षा ठाणेकरांना करावी लागणार आहे.

ठाणेकरांना दर्जेदार सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध व्हावी, नागरिकांचा प्रवास गारेगार व्हावा आणि शहरातील पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसेसची खरेदी ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाकडून खरेदी केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र आणि राज्य शासनाच्या १५ व्या वित्त आयोग तसेच पीएम ई-बससेवा योजनेंतर्गत पालिकेला एकूण ४०३ इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध होणार असून त्यापैकी १२३ बसेस काही वर्षांपूर्वी परिवहनच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत.

ठाणे शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात गेली आहे. प्रवासी संख्येच्या तुल नेत या बसेसची संख्या अपुरी पडत आहे. यामुळे बसेसची संख्या वाढविण्यावर प्रशासनाकडून भर देण्यात येत आहे.

नऊ मीटरच्या ६० आणि १२ मीटरच्या ४० अशा एकूण १०० बसेसची ठाणेकर वाट बघत आहेत. यापैकी २५ बसेस ऑगस्ट महिनाअखेर दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात होती.

केंद्र शासनाच्या पीएम ई-बससेवा योजनेंतर्गत विविध शहरांना देण्यात येणाऱ्या बसेसची नागपूर येथे तपासणी करण्यात आली होती. त्यात काही तांत्रिक त्रुटी आढळून आल्याने या बसेस अद्याप मिळू शकलेल्या नाहीत. तांत्रिक अडचणी दूर करून महिनाभरात बसेस दाखल होण्याची शक्यता आहे.

भालचंद्र बेहेरे (व्यवस्थापक ठाणे परिवहन)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महायुती सरकारकडून कर्जमाफीचे गाजर; बळीराजाला फसवले, थकबाकीदार शेतकऱ्यांना वसुलीसाठी कोर्टाची नोटीस ! महायुती सरकारकडून कर्जमाफीचे गाजर; बळीराजाला फसवले, थकबाकीदार शेतकऱ्यांना वसुलीसाठी कोर्टाची नोटीस !
विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेवर येताच महायुती सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांना...
अंगात सिंदूर नव्हे तर अंगात देशभक्ती भिनली पाहिजे, उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदी यांना जोरदार टोला
बाळासाहेब ठाकरेंवर आरोप करणाऱ्या सर्व भाजपच्या लोकांनी औकातीत रहावं, उद्धव ठाकरे यांचा इशारा
Israel Attack On Gaza : इस्रायलचा गाझावर पुन्हा प्रहार, 50 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू
“जय शहा, भाजप मंत्र्यांची मुलं भारत-पाकिस्तान सामना पाहायला जातील, पण प्रखर राष्ट्रभक्त…”, संजय राऊत यांचा हल्लाबोल
राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये येणार महिला राज; 34 पैकी 18 ठिकाणी महिला आरक्षण जाहीर
माकडाची दुचाकीवर झडप अपघातात पती ठार; पत्नी जखमी