गणपती गेले, फळांचे दर घसरले; 25 टक्क्यांनी फळे स्वस्त

गणपती गेले, फळांचे दर घसरले; 25 टक्क्यांनी फळे स्वस्त

गणेशोत्सवात चढ्या दराने विकली जाणारी फळे आता बाप्पाच्या विसर्जनानंतर मात्र घसरली आहेत. पूर्वी 200 रुपये किलो दराने विकले जाणारे सफरचंद आता 120 रुपयांवर आले असून एक किलो डाळिंबासाठी 220 ऐवजी 140 रुपये मोजावे लागत आहेत. सर्वच फळांच्या किमती सुमारे 25 टक्क्यांनी घसरल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गणेशोत्सवात पूजाअर्चा, प्रसाद व पाहुणचार यासाठी मोठ्या प्रमाणात फळांची खरेदी केली जाते. त्यामुळे या कालावधीत सफरचंद, संत्री, मोसंबी, सीताफळ आदी फळांचे भाव झपाट्याने वाढले होते. गणेशोत्सवामुळे बाजारात काही प्रमाणात उभारी आली होती. मात्र सण संपल्यानंतरही आवक सुरू असली तरी विक्रीत मंदी जाणवत आहे. घाऊक बाजारात भाव घसरले असले तरी किरकोळ बाजारात मात्र ग्राहकांना चढे भाव मोजावे लागत आहेत.

असे उतरले दर
पनवेलमधील घाऊक बाजारात सफरचंदांचा भाव तब्बल 200 रुपये किलोपर्यंत गेला होता. मात्र सण संपल्यानंतर भाव कमी होऊन सध्या 70 ते 120 रुपये किलोवर आला आहे. संत्र्यांचा भाव 20 ते 40 रुपये किलोपर्यंत, पेरू 12 ते 25 रुपये, टरबूज 31 ते 33 रुपये, पपई 15 ते 23 रुपये, सीताफळ 20 ते 120 रुपये, तर मोसंबीचा दर 26 ते 36 रुपये किलो इतका आहे.

पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीतील घाऊक फळ बाजारात रोज सरासरी साडेतीन ते चार हजार क्विंटल सफरचंद, पाचशे क्विंटल संत्री व दीड हजार क्विंटल सीताफळाची आवक होत आहे. मात्र सध्या पावसाच्या संततधारेमुळे ग्राहकांनी बाजारपेठेकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे मागणीत मोठी घट झाल्याने भाव खाली आले असल्याचे फळ व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महायुती सरकारकडून कर्जमाफीचे गाजर; बळीराजाला फसवले, थकबाकीदार शेतकऱ्यांना वसुलीसाठी कोर्टाची नोटीस ! महायुती सरकारकडून कर्जमाफीचे गाजर; बळीराजाला फसवले, थकबाकीदार शेतकऱ्यांना वसुलीसाठी कोर्टाची नोटीस !
विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेवर येताच महायुती सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांना...
अंगात सिंदूर नव्हे तर अंगात देशभक्ती भिनली पाहिजे, उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदी यांना जोरदार टोला
बाळासाहेब ठाकरेंवर आरोप करणाऱ्या सर्व भाजपच्या लोकांनी औकातीत रहावं, उद्धव ठाकरे यांचा इशारा
Israel Attack On Gaza : इस्रायलचा गाझावर पुन्हा प्रहार, 50 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू
“जय शहा, भाजप मंत्र्यांची मुलं भारत-पाकिस्तान सामना पाहायला जातील, पण प्रखर राष्ट्रभक्त…”, संजय राऊत यांचा हल्लाबोल
राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये येणार महिला राज; 34 पैकी 18 ठिकाणी महिला आरक्षण जाहीर
माकडाची दुचाकीवर झडप अपघातात पती ठार; पत्नी जखमी