नवी मुंबईतील 11 बिल्डरांची ओसी रोखणार, सर्वसामान्यांसाठी असलेली राखीव घरे हडप केली; 20 टक्क्यांतील 791 घरांची एसआयटी चौकशी

नवी मुंबईतील 11 बिल्डरांची ओसी रोखणार, सर्वसामान्यांसाठी असलेली राखीव घरे हडप केली; 20 टक्क्यांतील 791 घरांची एसआयटी चौकशी

सर्वसामान्य नवी मुंबईकरांच्या वाट्याला येणारी सर्वसमावेशक योजनेतील 20 टक्के घरे हडप करणाऱ्या बिल्डरांना आता मोठा धक्का बसला आहे. ही घरे लाटणाऱ्या 11 बिल्डरांच्या ओसी (भोगवटा प्रमाणपत्र) रोखण्याचे आदेश विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी महापालिका आणि सिडको प्रशासनाला दिले आहेत. या प्रकल्पातून नवी मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना 791 घरे मिळणार होती. मात्र बिल्डर आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने ही घरे परस्पर लाटण्यात आली. या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याच्या सूचनाही राम शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
राज्य सरकारने 18 नोव्हेंबर 2013 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार 10 लाख व त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या महापालि का हद्दीतील चार हजार चौरस मीटरपेक्षा अधिक भूखंड असलेल्या खासगी जमिनीवरील गृहनिर्माण प्रकल्पात 20 टक्के राखीव घरे किंवा गाळे म्हाडाला हस्तांतरित करण्याची तरतूद आहे. मात्र नवी मुंबई महापालिकेत अनेक नामांकित विकासकांकडून 2017 पासून 2022 पर्यंत चार हजार चौरस मीटरपेक्षा अधिक भूखंडावर गृहप्रकल्प उभारूनही त्यातील 20 टक्के घरे म्हाडाला हस्तांतरित करण्यात आली नाहीत.

विकासकांनी प्रकल्प उभारण्याच्या आधी घेतलेल्या बांधकाम परवान्यात दारिद्र्यरेषेखालील घरांसाठीची अट होती. मात्र या गृहप्रकल्पातील घरे गरीबांना मिळू नयेत म्हणून जाणूनबुजून विकासकांकडून यूडीसीपीआर-2020 मधील अटींचा आधार घेतला गेला आहे. अधिकाऱ्यांशी संगनमत करून दारिद्र्यरेषेखालील सर्वसामान्यांसाठी असलेली घरे वगळण्यात आली. या प्रकल्पांना पुन्हा नव्याने सुधारित सीसी देण्याचा कारनामाही करण्यात आला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. विधान परिषदेमध्ये हा प्रश्न उपस्थित झाला होता.

या घोटाळ्यासंदर्भात विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीला अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे उपस्थित होते.

बैठकीदरम्यान नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी यात चूक झाल्याचे मान्य केले. त्याचप्रमाणे या प्रकरणाच्या चौकशीसाठी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचेही यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.

परवान्यात दारिद्र्यरेषेखालील घरांसाठीची अट होती. मात्र या गृहप्रकल्पातील घरे गरीबांना मिळू नयेत म्हणून जाणूनबुजून विकासकांकडून यूडीसीपीआर-2020 मधील अटींचा आधार घेतला गेला आहे. अधिकाऱ्यांशी संगनमत करून दारिद्र्यरेषेखालील सर्वसामान्यांसाठी असलेली घरे वगळण्यात आली. या प्रकल्पांना पुन्हा नव्याने सुधारित सीसी देण्याचा कारनामाही करण्यात आला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. विधान परिषदेमध्ये हा प्रश्न उपस्थित झाला होता. या घोटाळ्यासंदर्भात विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीला अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे उपस्थित होते.

बैठकीदरम्यान नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी यात चूक झाल्याचे मान्य केले. त्याचप्रमाणे या प्रकरणाच्या चौकशीसाठी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचेही यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोणावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घ्या !
नवी मुंबईत 2017 पासून 2022 पर्यंत अनेक गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात आले. मात्र सर्वसामान्यांसाठी 20 टक्के घरे म्हाडा किंवा सिडकोला हस्तांतरित करण्यात आली नाहीत. सर्वांना परवडणारी घरे उपलब्ध व्हावीत यासाठी शासनाने हे धोरण आणले आहे. त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी चौकशी समितीने घ्यावी. चौकशी अहवाल येईपर्यंत अशा सर्व 11 बांधकाम व्यावसायिकांची ओसी रोखण्यात यावी असेही राम शिंदे यावेळी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महायुती सरकारकडून कर्जमाफीचे गाजर; बळीराजाला फसवले, थकबाकीदार शेतकऱ्यांना वसुलीसाठी कोर्टाची नोटीस ! महायुती सरकारकडून कर्जमाफीचे गाजर; बळीराजाला फसवले, थकबाकीदार शेतकऱ्यांना वसुलीसाठी कोर्टाची नोटीस !
विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेवर येताच महायुती सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांना...
अंगात सिंदूर नव्हे तर अंगात देशभक्ती भिनली पाहिजे, उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदी यांना जोरदार टोला
बाळासाहेब ठाकरेंवर आरोप करणाऱ्या सर्व भाजपच्या लोकांनी औकातीत रहावं, उद्धव ठाकरे यांचा इशारा
Israel Attack On Gaza : इस्रायलचा गाझावर पुन्हा प्रहार, 50 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू
“जय शहा, भाजप मंत्र्यांची मुलं भारत-पाकिस्तान सामना पाहायला जातील, पण प्रखर राष्ट्रभक्त…”, संजय राऊत यांचा हल्लाबोल
राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये येणार महिला राज; 34 पैकी 18 ठिकाणी महिला आरक्षण जाहीर
माकडाची दुचाकीवर झडप अपघातात पती ठार; पत्नी जखमी