भाईंदरमध्ये डंपरने मुलाला चिरडले; संतप्त नागरिकांचे रस्त्यावर ठिय्या आंदोलन, आक्रमक पवित्र्यानंतर आरएमसी प्लाण्ट बंद

भाईंदरमध्ये डंपरने मुलाला चिरडले; संतप्त नागरिकांचे रस्त्यावर ठिय्या आंदोलन, आक्रमक पवित्र्यानंतर आरएमसी प्लाण्ट बंद

काशिमीरा येथील नीलकमल नाक्याजवळ गुरुवारी सिमेंट काँक्रीटची वाहतूक करणाऱ्या डंपरने सनी राठोड या बारा वर्षांच्या मुलाला चिरडले. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आज ठिय्या आंदोलन करत निषेध केला. तसेच आरएमसी प्लाण्टला परवानगी देणाऱ्या प्रशासनाविरोधात घोषणा देण्यात आल्या. नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर काशिमीरा परिसरातील पाच आरएमसी प्लाण्ट बंद करण्यात आले आहेत. तसे पत्रच महापालिकेने मालकांना दिले असून हयगय करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे.

सनी राठोड हा गुरुवारी रस्त्याने जात असताना मागून आरएमसी प्लाण्टमधून आलेल्या डंपरने त्याला जोरदार धडक दिली. डंपरचे चाक त्याच्या पायावरून गेल्याने तो गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. राठोड याला तातडीने स्थानिक नागरिकांनी आशिष रुग्णालयात दाखल केले पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या अपघातानंतर डंपरचालक प्रमोद यादव याला पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात संताप व्यक्त होत आहे.

पालिका अधिकाऱ्यांचे आदेश

आज काशिमीरा परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन आरएमसी प्लाण्ट तत्काळ बंद करा, अशी मागणी करीत आंदोलन छेडले. माशाचा पाडा येथे मोठ्या प्रमाणावर सिमेंट काँक्रीटचे प्लाण्ट सुरू असून यापूर्वीदेखील अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे हे प्लाण्ट बंद करा, अशी मागणी करण्यात आली. ती मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा इशारा दिला. अखेर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख नरेंद्र चव्हाण यांनी तातडीने पाच आरएमसी प्लाण्ट बंद करण्याचे आदेश दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महायुती सरकारकडून कर्जमाफीचे गाजर; बळीराजाला फसवले, थकबाकीदार शेतकऱ्यांना वसुलीसाठी कोर्टाची नोटीस ! महायुती सरकारकडून कर्जमाफीचे गाजर; बळीराजाला फसवले, थकबाकीदार शेतकऱ्यांना वसुलीसाठी कोर्टाची नोटीस !
विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेवर येताच महायुती सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांना...
अंगात सिंदूर नव्हे तर अंगात देशभक्ती भिनली पाहिजे, उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदी यांना जोरदार टोला
बाळासाहेब ठाकरेंवर आरोप करणाऱ्या सर्व भाजपच्या लोकांनी औकातीत रहावं, उद्धव ठाकरे यांचा इशारा
Israel Attack On Gaza : इस्रायलचा गाझावर पुन्हा प्रहार, 50 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू
“जय शहा, भाजप मंत्र्यांची मुलं भारत-पाकिस्तान सामना पाहायला जातील, पण प्रखर राष्ट्रभक्त…”, संजय राऊत यांचा हल्लाबोल
राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये येणार महिला राज; 34 पैकी 18 ठिकाणी महिला आरक्षण जाहीर
माकडाची दुचाकीवर झडप अपघातात पती ठार; पत्नी जखमी