आदिवासी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती लाटली, अंबरनाथच्या जावसई शाळेतील शिक्षकांचा प्रताप तिथे पालकांच्या अंगठ्याचे ठसे

आदिवासी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती लाटली, अंबरनाथच्या जावसई शाळेतील शिक्षकांचा प्रताप तिथे पालकांच्या अंगठ्याचे ठसे

शासनाच्या सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात येतो. मात्र अंबरनाथ तालुक्यातील जावसई शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची शिष्यवृत्तीच मिळाली नाही. शाळेतील रजिस्टरवर शिष्यवृत्तीचे पैसे विद्यार्थ्यांना देण्यात आल्याचे नमूद करून पालकांच्या बोगस सह्या केल्या आहेत. याबाबत पालकांनी अंबरनाथ पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी शिष्यवृत्तीचे पैसे लाटल्याची तक्रार केली आहे.

इयत्ता १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांना १००० रुपये आणि ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांना १५०० आणि ८ वीपासून पुढे २००० रुपये अशी शिष्यवृत्तीची रक्कम देण्यात येते. मात्र जावसई येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील काही विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती मिळाली नाही. धक्कादायक बाब म्हणजे शाळेतील रजिस्टरवर शिष्यवृत्तीचे पैसे विद्यार्थ्यांना देण्यात आले असून तसेच स्वाक्षरी आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे, अंगठ्याचे ठसे आणि स्वाक्षरी बनावट असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. याबाबत पालकांनी गटशिक्षण अधिकारी विशाल पोतेकर यांच्याकडे लेखी तक्रार करून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती लाटणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सुनीता वाघे यांच्यासह पालकांनी केली आहे.

शाळेतील हे रजिस्टर आम्ही ताब्यात घेतले असून पालकांच्या तक्रारीनुसार चौकशी करण्यात येत आहे. चौकशी अहवाल शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषदेला सादर करण्यात येईल.

विशाल पोतेकर, गट शिक्षण अधिकारी

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महायुती सरकारकडून कर्जमाफीचे गाजर; बळीराजाला फसवले, थकबाकीदार शेतकऱ्यांना वसुलीसाठी कोर्टाची नोटीस ! महायुती सरकारकडून कर्जमाफीचे गाजर; बळीराजाला फसवले, थकबाकीदार शेतकऱ्यांना वसुलीसाठी कोर्टाची नोटीस !
विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेवर येताच महायुती सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांना...
अंगात सिंदूर नव्हे तर अंगात देशभक्ती भिनली पाहिजे, उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदी यांना जोरदार टोला
बाळासाहेब ठाकरेंवर आरोप करणाऱ्या सर्व भाजपच्या लोकांनी औकातीत रहावं, उद्धव ठाकरे यांचा इशारा
Israel Attack On Gaza : इस्रायलचा गाझावर पुन्हा प्रहार, 50 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू
“जय शहा, भाजप मंत्र्यांची मुलं भारत-पाकिस्तान सामना पाहायला जातील, पण प्रखर राष्ट्रभक्त…”, संजय राऊत यांचा हल्लाबोल
राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये येणार महिला राज; 34 पैकी 18 ठिकाणी महिला आरक्षण जाहीर
माकडाची दुचाकीवर झडप अपघातात पती ठार; पत्नी जखमी