इंडिगोचे दिल्लीला जाणारे विमान टेकऑफनंतर लगेचच पाटण्याला परतले, पक्ष्याच्या धडकेमुळे इंजिनात बिघाड

इंडिगोचे दिल्लीला जाणारे विमान टेकऑफनंतर लगेचच पाटण्याला परतले, पक्ष्याच्या धडकेमुळे इंजिनात बिघाड

बुधवार (9 जुलै ) सकाळी पाटणा विमानतळावरून दिल्लीला जाणारे इंडिगोचे विमान टेकऑफनंतर काही मिनिटांतच आपत्कालीन स्थितीत परतावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार टेक ऑफ दरम्यान विमानाच्या एका इंजिनला पक्षी धडकला होता. त्यामुळे विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला. सुरक्षिततेचा विचार करून वैमानिकाने सावधगिरी बाळगून पाटणा विमानतळावर विमान सुरक्षितपणे परत उतरवले. या विमानात एकूण 169 प्रवासी होते.

टाइम्स आॅफ इंडियाच्या वृत्तानुसार पाटणा विमानतळावरून विमानाने सकाळी 8.41 वाजता उड्डाण केले होते. परंतु उड्डाणानंतर लगेचच एका इंजिनमध्ये कंपन जाणवल्यामुळे विमानाला लगेचच पाटणा येथे परतावे लागले. सध्या या विमानाची तांत्रिक तपासणी सुरू आहे आणि प्रवाशांना दिल्लीला नेण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे.

पाटणा विमानतळाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “पाटणा ते दिल्लीला जाणाऱ्या विमान IGO5009 ने टेक ऑफ नंतर लगेचच पक्ष्याला धडक दिली. धावपट्टीवर तपासणीदरम्यान एका मृत पक्ष्याचे तुकडे आढळले. ही माहिती अ‍ॅप्रोच कंट्रोल युनिटद्वारे विमानाला देण्यात आली.” विमानतळ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, “पक्षी आदळल्यानंतर विमानाच्या इंजिनमध्ये कंपन दिसले होते. यावेळी पायलटने प्रसंगावधान राखून विमान लगेच पाटण्याला वळवले आणि धावपट्टी 7 वर सुरक्षितपणे उतरले.”

यापूर्वी मंगळवारी (8 जुलै) सकाळी तांत्रिक बिघाडामुळे इंदूरहून रायपूरला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला उड्डाणानंतर सुमारे 30 मिनिटांनी आपत्कालीन लँडिंग करावे लागले. फ्लाइट क्रमांक 6E- 7295 दररोज सकाळी 6.35 वाजता इंदूरहून निघाले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

श्रावणात मासांहार न करण्याची शास्त्रीय कारणे जाणून घ्या श्रावणात मासांहार न करण्याची शास्त्रीय कारणे जाणून घ्या
आपल्या हिंदु धर्मामध्ये श्रावण महिन्याचं महत्त्व हे खूप खास आहे. श्रावण महिना या व्रत वैकल्यांचा महिना म्हणूनच ओळखला जातो. श्रावणामध्ये...
कंत्राटदार हर्षल पाटीलची आत्महत्या हा सरकारने केलेला सदोष मनुष्य वध, संजय राऊत यांचा घणाघात
तुम्ही आपटून आपटून कुणाला आणि कसे मारणार? मराठी खासदारांनी निशिकांत दुबेंना संसदेत घेरलं; टप्प्यात येताच कार्यक्रम
एकतर्फी प्रेमातून विकृताचे भयंकर कृत्य; महिलेच्या पतीची हत्या करून मृतदेह चिखलात गाडला, वाशी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या अवळल्या
ठाण्यात स्कूलबसमध्ये मेंढरासारखी कोंबाकोंबी, सीएनजीच्या बाटल्यावर बैठक; विद्यार्थी गॅसवर, आरटीओचा 48 जणांवर कारवाईचा बडगा
शहापुरात ‘चिखल’ पूर, गर्भवतीची झोळीतून एक किलोमीटर फरफट
पंढरपूर कॉरिडॉर लपूनछपून करणार नाही! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस