सांगली जिल्हा बँकेकडून खरिपासाठी 801 कोटींचे कर्जवाटप

सांगली जिल्हा बँकेकडून खरिपासाठी 801 कोटींचे कर्जवाटप

जिह्यात खरीप हंगामाला सुरुवात झाली असून, पेरण्यांची धांदल उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून खरिपाच्या पेरणीसाठी जूनअखेर तब्बल 801 कोटी 40 लाख रुपयांचे पीककर्जवाटप करण्यात आले आहे. जिह्यात कर्जवाटपाचे हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या 70 टक्के आहे. आतापर्यंत जिह्यातील 88 हजार 154 शेतकऱयांना पीककर्जाचा लाभ मिळाला असून, 30 सप्टेंबरपर्यंत कर्जवाटप करण्यात येणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितले.

चालूवर्षी मे महिन्यापासून धुवांधार पावसाला सुरुवात झाली आहे. जुलैच्या पहिल्या आठवडय़ात पावसाचा जोर कमी झाल्याने शेतात पेरणीची धांदल उडाली आहे. पेरणीसाठी बियाणे आणि खत खरेदीसाठी शेतकऱयांची लगबग सुरू असून, त्यासाठी त्यांना जून महिन्यापूर्वीच पीककर्ज मिळणे गरजेचे असते. परंतू मे आणि जूनमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पेरण्यांना विलंब झाला आहे. तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्जाचे शून्य टक्के व्याज आकारले जाते. हंगामासाठी जिल्हा बँकेकडून खरीप हंगामासाठी कर्जवाटप केले जात आहे.

जिल्हा बँकेला खरीप हंगामातील पिकांसाठी 1 हजार 148 कोटी 4 लाख रुपयांचे पीक कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट येत्या 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावे लागणार आहे. जूनअखेर जिह्यातील 88 हजार 154 शेतकऱयांना तब्बल 801 कोटी 40 लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. उद्दिष्टापैकी 70 टक्के कर्जवाटपाचे उद्दिष्ट पहिल्या अडीच महिन्यांत पूर्ण झाले आहे.

ऊसपिकासाठी सर्वाधिक 50 हजार 384 शेतकऱयांना 445 कोटी 9 लाख रुपयांचे कर्ज दिले आहे. सोयाबीनसाठी 6 हजार वीस शेतकऱयांना 2 कोटी 16 लाख, डाळिंब 6 हजार 82 शेतकऱयांना 6 कोटी 18 लाख, द्राक्षांसाठी दहा हजार 30 शेतकऱयांना 217 कोटी 97 लाख, कापसासाठी 11 हजार 647 शेतकऱयांना 3 कोटी 96 लाख, याशिवाय इतर पिकांसाठी एक हजार 16 शेतकऱयांना 6 कोटी 82 लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आल्याचे बँकेचे अध्यक्ष नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी वाघ यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

विश्वजित थविल, शरयू रांजणे, ऋत्व सजवान, शौर्या मडवी यांना अग्रमानांकन; राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा विश्वजित थविल, शरयू रांजणे, ऋत्व सजवान, शौर्या मडवी यांना अग्रमानांकन; राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा
विश्वजित थविल, शरयू रांजणे, ऋत्व सजवान, शौर्या मडवी यांना योनेक्स सनराईज राज्यस्तरीय 15 व 17 वर्षांखालील बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत अग्रमानांकन...
सतेज, राजमाता जिजाऊ संघांना विजेतेपद
बंगाली भाषेवरील अत्याचार खपवून घेतला जाणार नाही, भाषेच्या वादावरून ममता बॅनर्जी भाजपवर संतापल्या
प्रकाश राज, विजय देवरकोंडा आणि राणा दग्गुबती यांना ईडीने बजावले समन्स; काय आहे प्रकरण?
Patanjali: लठ्ठपणा आणि बारीकपणावर उपाय सापडला, बाबारामदेव म्हणाले की…
उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचा राजीनामा, प्रकृती अस्वास्थ्याचे दिले कारण
गुप्तधनाच्या हव्यासातून 60 लाखांचा गंडा; 10 हजार अत्तराच्या बाटल्या, एक हजार नारळ आणि 10 हजार सिगारेट्स जाळल्या