वाघ गवत खात नाही, शरण जात नाही! संजय राऊत यांची जबरदस्त डरकाळी; मिंधे गटासह भाजपचा घेतला समाचार

वाघ गवत खात नाही, शरण जात नाही! संजय राऊत यांची जबरदस्त डरकाळी; मिंधे गटासह भाजपचा घेतला समाचार

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवानद करतो. या शिवसेनेचं रोपटं नव्हे त्यांनी झाडचं लावलं होतं. आणि त्या शिवसेनेला 59 वर्षे आज होताहेत. देशातल्या राजकारणातला हा एक चमत्कार आहे, असे म्हणत शिवसेना (उद्वव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात शिवसैनिकांमध्ये उत्साह आणि जोश भरला.

आज कोणताही मनोरंजनाचा कार्यक्रम नाही. फक्त विचार देण्याचा कार्यक्रम आहे. मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवण्याचं फार कारण दिसत नाही. कारण आपलं मनोरंजन करण्याची जबाबदारी या सरकारने घेतली आहे. रोज काहीतरी एक वेगळा कार्यक्रम ज्याला आपण शो म्हणतो… आज हॉरर शो झाला. थरारक सिनेमा, कोणीतरी एक मंत्री एका आघोरी बाबासमोर बसलेला आहे. उघडा बंब, टॉवेलवर… त्या आघोरी बाबाच्या हातात कवटी आहे आणि बहुतेक त्याच्या खुर्चीखाली रेड्याचं शिंग असावं. आणि बराच वेळ तो आघारी विद्येचा कार्यक्रम सुरू होता. आज सकाळी हॉरर सिनेमा पाहिला. या हॉरर सिनेमाचे कलाकार, निर्माते, दिग्दर्शक त्यांचा सुद्धा आज एक कार्यक्रम कुठेतरी सुरू आहे हॉरर कार्यक्रम, डोममध्ये. या महाराष्ट्रात इतके मनोरंजनाचे कार्यक्रम होत आहे आता उद्धव ठाकरेसाहेबांनी ठरवलं की आपल्याला अशा कार्यक्रमाची गरज नाही. आपण थेट विचार देऊ या. 59 वर्षांच्या शिवसेनेला सातत्याने जर कोणता कार्यक्रम बाळासाहेबांनी दिला असेल तर तो या राज्याला आणि देशाला विचार देण्याचा, असे संजय राऊत म्हणाले.

“शिवसेना किसीसे कम नही”

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मराठवाड्यात त्यांनी शेकडो गावात, असंख्य तालुक्यात, गावपतळीवर आंदोलन केले. क्या हुआ तेरा वादा, क्या हुआ ओ कसम ओ इरादा… खरं म्हणजे या शिवसेनाचं नाव फार इन्ट्रेस्टिंग आहे शिवसैनिकांसाठी… जाताना त्यांनी तो मंत्र म्हणून घेऊन गेला पाहिजे. त्या सिनेमाचं नाव आहे ‘हम किसीसे कम नही’ इथे बसलेले शेकडो शिवसैनिक त्यांनी आपल्या मनाशी एक आत्मविश्वास, एक निर्धार आणि एक जिद्द पक्की ठेवली पाहिजे की ‘हम किसीसे कम नही’, ‘शिवसेना किसीसे कम नही’. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी या शिवसेनेची स्थापना केलेली आहे, असे संजय राऊत पुढे म्हणाले.

आज मुंबईत इकडे तिकडे होर्डिंग लागलेली आहेत. ज्यांचा जन्म दोन वर्षांपूर्वी झाला. त्यांनाही वाटतंय आपण 59 वर्षांचे झालो. आता या मुंबईमध्ये त्यांच्या पक्षाचा स्थापना सोहळा करणं हा मराठी माणसाचा अपमान आहे, त्यांचा सोहळा सुरतला व्हायला पाहिजे. मुंबईत शिवसेनेची स्थापना झाली. शिवसेनेची स्थापना शिवतीर्थावर झाली, बाळासाहेब ठाकरे यांनी केली, उद्धवसाहेब ठाकरे यांची… तुमचा पक्ष स्थापन झाला गुजरातमध्ये आणि तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो कसा काय लावू शकता? तुमच्या पक्षाचे प्रमुख आहेत अमित शहा. तुम्ही अमित शहांचा फोटो लावा. वाटल्यास नरेंद्र मोदींचा लावा, आमची काही हरकत नाही. दोन वर्षापूर्वी तुमच्या गटाची स्थापना झाली आहे. तुमचा पुढचा कार्यक्रम… मी त्यांना विनंती करतो किंवा देवेंद्रजींना विनंती करतो, तुम्ही भारतीय जनता पक्षाने त्यांच्या पुढल्या कार्यक्रमाची स्पॉन्सरशिप करावी. सरदार वल्लभाई पटेल स्टेडियममध्ये… आता नरेंद्र मोदी स्टेडियम नाव केलं आहे. पण ते इथे कार्यक्रम करताहेत, असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी लगावला.

“…तेव्हा आजचे सगळे पक्ष हे पाळण्यामध्ये होते”

शिवसेना 59 वर्षांची झाली हा या देशातल्या राजकारणातला चमत्कारच आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी तेव्हा सांगितलं होतं या देशामध्ये फक्त दोनच सेना राहतील एक भारतीय सेना आणि दुसरी शिवसेना. बाकी सगळ्या गुंडांच्या टोळ्या. 59 वर्षांची शिवसेना ही आजही विचाराने तरुण आहे. डोंगर कधी म्हातारा होत नाही आणि तुफानाचं वय मोजायचं नसतं. आणि वाघ कधी शरण जात नाही आणि वाघ कधी गवतही खात नाही. नाहीतर हे जे स्वतःला वाघ समजणारे लोक आहेत ते अमित शहांचं गवत खाताहेत, मोदींचं गवत खाताहेत. मी जेव्हा म्हणतो की शिवसेना या देशातल्या राजकारणातला हा सगळ्यात जुना पक्ष आहे. सगळ्यात जुना पक्ष, अनुभवी तर, हा बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना आहे. जेव्हा शिवसेना या महाराष्ट्रात गर्जना करत होती, लढाया लढत होती, संघर्ष करत होती, मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी तेव्हा आजचे सगळे पक्ष हे पाळण्यामध्ये होते. भारतीय जनता पक्षाता जन्म 1980 मध्ये झाला. राष्ट्रीय काँग्रेसचा जन्म 1976 मध्ये पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा 1999 साली जन्माला आला. बाकी सर्व पक्ष देशातले हे शिवसेनेच्या स्थापनेनंतर जन्माला आले. आणि शिवसेना हा एकमेव पक्ष आहे आज असा की त्या पक्षानं 59 उन्हाळे पावसाळे वादळं तुफान अंगावर झेलले आहेत. आणि त्यातून आम्ही अत्यंत खंबीरपणे उभे आहोत, असा निशाणा संजय राऊत यांनी विरोधकांवर साधला.

“सरेंडर होण्याचे काम नरेंदर और देवेंदर का है, हमारा नाही, हम लढने वाले लोग है”

आमच्या जीवनातला संघर्ष कधी संपला नाही. संघर्ष आमचा ऑक्सिजन आहे, संघर्ष आमचा प्राणवायू आहे. याचं कारण असं आहे, हा पक्ष भ्रष्टाचाराच्या आणि ठेकेदारांच्या पैशावर उभा राहिला नाही तर, शिवसैनिकांच्या रक्तावर घामावर आणि संघर्षावर उभा राहिलेला आहे. गेल्या चार वर्षांत काय कमी संकटं आली. पण असंख्य संकटं आली गेल्या 59 वर्षांमध्ये. शिवसेनाप्रमुखांच्या डोळ्यासमोर त्यांनी घडवलेली माणसं सोडून गेली. माननीय उद्धवसाहेबांनी ज्यांना मोठी-मोठी पदं दिली ते सोडून गेले. माननीय बाळासाहेब असतील माननीय उद्धवजी असतील मी नेहमी सांगतो, ठाकरेंनी माकडांची माणसं केली. त्या माणसांना सरदार सुद्धा आपणच बनवलं. आणि त्याच सरदाराने आमच्या पाठीमध्ये घाव घातला आहे. आणि इतक्या हल्ल्यानंतर सुद्धा ही शिवसेना कधी झुकली नाही, वाकली नाही. कुणाच्या चरणाशी बसली नाही. नाहीतर या भुतलावर असे अनेक नेते आहेत 56 इंच छातीवाले. एक ट्रम्पचा फोन येतो आणि सरेंडर होतात. आमच्यावर सुद्धा, माननीय उद्धवसाहेबांवर, आमच्या नेत्यांवर सुद्धा असे अनेक फोन, असे अनेक दबाव आमच्यावर आले पण आम्ही झुकलो नाही. सरेंडर होण्याचे काम नरेंदर और देवेंदर का है, हमारा नाही. हम लढने वाले लोग है, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

“ते चार अतिरेकी ज्यांनी आमच्या माय भगिनींचं कुंकू पुसलं ते गेले कुठे?”

देशात काय चाललंय? हिंदुस्थानसारख्या महान देशात कश्मीर आपल्या देशाचं एक महत्त्वाचं अंग आहे. महाराष्ट्रासह देशातले असंख्य पर्यटक पहलगामला जातात. तिथे चार अज्ञात लोक शस्त्र घेऊन बंदुक घेऊन येतात. धर्म विचारतात आणि धर्म विचारून आमच्या 26 माय भगिनींचं माथ्यावरचं कुंकू पुसतात, सिंदूर उजाड करतात. आख्ख्या देशात हल्लकल्लोळ माजतो. हाहाःकार माजतो, आक्रोश होतो. पण त्या पहलगामच्या हल्ल्याला दोन महिने होऊन गेले तरी त्या चार अतिरेक्यांचा शोध हे 56 इंचाचं सरकार घेऊ शकलं नाही. कुठे गेले ते चार दहशतवादी? तुम्ही पाकिस्तानवर बॉम्ब टाकला, मिसाइल टाकले, सगळं केलं मग माघार घेतली. पण मुख्य प्रश्न कायम आहे. ते चार अतिरेकी ज्यांनी आमच्या माय भगिनींचं कुंकू पुसलं ते जमिनीत गडप झाले, हवेत अदृश्य झाले, आकाशात गेले, पाताळात गेले, गेले कुठे? याचा शोध या देशाच्या गृहमंत्र्यांना अजून घेता आला नाही. आणि तुम्ही आम्हाला शौर्याच्या आणि राष्ट्रभक्तीच्या गोष्टी सांगता? कशा करता? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

“हे सरकार डी कंपनी चालवतेय”

ऑपरेशन सिंदूर सुरू झालं. देशावर हल्ला झाला. उद्धवजींनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं, खासदारांना सांगितलं, नेत्यांना सांगितलं की हा देशावरचा हल्ला आहे, हे देशावरचं संकट आहे. आपल्यावरचं सगळे मतभेत विसरून सरकार जे कारवाई करतंय, कृती करतेय आपण त्यांच्या मागे ठामपणे उभ राहायला पाहिजे हीच आपली राष्ट्रभक्ती आहे. पण राजकारण कोणी सुरू केलं या हल्ल्याचं तर भारतीय जनता पक्षानं सुरू केलं. ऑपरेशन सिंदूरच्या नावानं मतं मागितली जाताहेत. हा आमच्या माय भगिनींच्या पुसलेल्या कुंकवाचा अपमान आहे. आम्हाला असं वाटलं की, मोदींनी आता लढण्याची सुरुवात केली आहे पाकिस्तान विरुद्ध आता पाकिस्तानचे चार तुकडे करूनच आमचं सैन्य मागे घेतील. इस्लामाबाद, कराची, लाहोर, बलुचिस्तानवरती तिरंगा फडकवून आमचं सैन्य मागे येईल. पाकिस्तानातील सगळे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करून आमचं सैन्य मागे येईल, असं वाटलं होतं. पण काय दुर्दैवं या देशाचं. आमचं सैन्य आक्रमण पुढे-पुढे जात असताना, हवाई दल हल्ले करत असताना अमेरिकेतून एक फोन येतो प्रेसिडेंट ट्रम्पचा आणि त्या एका फोन नंतर हिंदुस्थान दहशतवाद विरुद्धची लढाई थांबवतो. आणि ही माघार का घेतली हे नरेंद्र मोदी आजही आम्हाला सांगू शकलेले नाहीत. आणि आज तेच प्रेसिडेंट ट्रम्प पाकिस्तानच्या सैन्यप्रमुखाला त्यांच्या व्हाईट हाउसमध्ये डिनरला बोलवतात आणि बोलतात आय लव्ह पाकिस्तान, हे नरेंद्र मोदींचे मित्र? आणि आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवता? आम्हाला हिंदुत्व शिकवता? या देशामध्ये डी कंपनीचं राज्य सुरू आहे. दिल्लीमध्ये डी म्हणजे डरपोक आणि महाराष्ट्रातलं डी म्हणजे डायरेक्ट डी. ज्याला तुम्ही डीडी म्हणता… या डी कंपनीतले मुंबईतले महाराष्ट्रातले अंडरवर्ल्डचे सगळे लोकं भारतीय जनता पक्षाने आपल्या सरकारमध्ये घेतले आहेत. त्याच्यामुळे हे सरकार डी कंपनी चालवतेय. आणि मला असं वाटतं प्रत्येक शिवसैनिकानं मतदारांपर्यंत लोकांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन गेलं पाहिजे, असे आवाहन संजय राऊत यांनी यावेळी केले.

“आम्ही लढणारे लोक आहोत आणि आम्ही लढत राहू” 

शिवसैनिक कधी खचणारा नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला जी प्रेरणा आणि उर्जा दिलेली आहे ती अशी कच खाणारी नाही. आम्ही लढणारे लोक आहोत आणि आम्ही लढत राहू. आमचा नेता सन्मानीय उद्धव ठाकरे हा सुद्धा रणमैदानात उभा राहून सगळी आव्हानं झेलत आमच्या बरोबल लढतोय हे लक्षात घ्या. जाता-जाता मी इतकचं सांगेन उद्धवसाहेब हे चित्र आपण पाहिलं असेल, हा उत्साह आपण पाहिला असेल महाराष्ट्रात शिवसेनेचे नेते जिथे-जिथे जाताहेत त्या प्रत्येक ठिकाणी शेतकरी, कष्टकरी, कार्यकर्ते हे जमा होताहेत. कालच्या विधानसभेच्या निकालावर त्यांचा आजही विश्वास नाही. पण तरीही ते लढण्यासाठी उभे आहेत. आपलं नेतृत्व त्यांना हवं आहे. आणि संघर्ष करण्याची त्यांची तयारी आहे. शिवसेनेचा पुढला विजयाचा मंत्र कोणता असेल तर लक्षात घ्या संघर्ष हाच आमच्या विजयाचा मंत्र आहे. हिंदीमध्ये एक प्रसिद्ध कवी आहेत, गोपाळदास नीरज म्हणून… त्यांच्या फक्त ओळी ऐकवतो… अत्यंत प्रेरणादायी आहेत. जेव्हा जेव्हा माझ्या सारख्या माणसाला असं वाटतं आता सगळं काही संपतंय. तेव्हा त्या नीरजच्या कवितांचं पुस्तक काढतो आणि त्या दोन ओळी वाचतो…

है बहुत अंधियार अब सूरज निकलना चाहिए
जिस तरह से भी हो ये मौसम बदलना चाहिए

रोज़ जो चेहरे बदलते है लिबासों की तरह
अब जनाज़ा ज़ोर से उन का निकलना चाहिए

अब भी कुछ लोगो ने बेची है न अपनी आत्मा
ये पतन का सिलसिला कुछ और चलना चाहिए

फूल बन कर जो जिया है वो यहां मसला गया
ज़ीस्त को फ़ौलाद के सांचे में ढलना चाहिए

छीनता हो जब तुम्हारा हक़ कोई उस वक़्त तो
आंख से आंसू नहीं शोला निकलना चाहिए

ही शिवसैनिकांसाठी प्रेरणा आहे. आपण चिडलं पाहिजे आणि संतापलो पाहिजे. आमच्यावर झालेल्या अन्याया विरुद्ध आहे. निवडणूक आयोग, अमित शहा ठरवू शकत नाही शिवसेना कोणाची आहे? उद्या आम्ही ठरवू अमित शहा या देशात राहील की देशाच्या तुरुंगात राहील, असा इशारा यावेळी संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

क्रिकेट खेळल्यानंतर समुद्रात अंघोळीचा मोह जीवावर बेतला, पालघरमध्ये अल्पवयीन मुलगा बुडाला क्रिकेट खेळल्यानंतर समुद्रात अंघोळीचा मोह जीवावर बेतला, पालघरमध्ये अल्पवयीन मुलगा बुडाला
बीचवर क्रिकेट खेळल्यानंतर मित्रांसोबत समुद्रात अंघोळीसाठी गेलेला 17 वर्षीय मुलगा बुडाला. पालघरमधील सातपाटी येथील समुद्रकिनारी ही घटना घडली. उमेद इमरान...
यात्रा अनुदान पाच कोटी, खर्च पंधरा कोटी; पंढरपूर यात्रा अनुदानात भरीव वाढ करण्याची गरज
जागतिक सिकलसेल दिनी दिल्लीच्या एम्समध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन, औषध विकसित करण्यासाठी मोठी घोषणा!
पावसाळ्यात या 5 भाज्या म्हणजे शरीरावर विषासारखा परिणाम करतील; चुकूनही खाऊ नका
शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसण्याचा प्रयत्न केला तर भाजपचा नामोनिशाण मिटवू! उद्धव ठाकरे कडाडले, मुंबई जिंकण्याचा निर्धार
ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे निधन, मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा
वाघ गवत खात नाही, शरण जात नाही! संजय राऊत यांची जबरदस्त डरकाळी; मिंधे गटासह भाजपचा घेतला समाचार