मुंबईत जे पाणी भरलं त्यासाठी पालकमंत्री जबाबदार नाही का? आदित्य ठाकरे यांचा सवाल

मुंबईत जे पाणी भरलं त्यासाठी पालकमंत्री जबाबदार नाही का? आदित्य ठाकरे यांचा सवाल

सोमवारी मुंबईत पाऊस झाला आणि अनेक ठिकाणी पाणी भरलं होतं. यासाठी कंत्राटदार जबाबदार असल्याचे पालिकेने म्हटले आहे. त्याचे पाण्याचे पंप वेळेत न लावल्याने या कंत्राटदारांवर 10 लाख रुपयांचा दंड आकारला आहे. पण यासाठी मुंबईचे पालकमंत्री जबाबदार नाही का असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे, नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे. तसेच या लोकांना शहर चालवता येत नाही असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, सरकार त्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकतील पण त्या तीन पालक मंत्र्यांचे काय? पालिकेत कार्यालयासाठी पालकमंत्री घुसखोरी करतील, पण मुंबईत जे पाणी भरलं ती पालकमंत्र्यांची जबाबदारी नाही?

तसेच पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे काय? मान्सूनपूर्व झालेल्या बैठकांचे काय? ज्या रस्ते घोटाळे आम्ही उघड करतोय त्याचे काय? इतरांवर जबाबदारी ढकलने सोपे आहे. हे लोक जबाबदारीपासून पळ काढू शकतात हे सिद्ध झाले. हे नेते शहर चालवू शकत नाहीत असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;