मुंबईत जे पाणी भरलं त्यासाठी पालकमंत्री जबाबदार नाही का? आदित्य ठाकरे यांचा सवाल

मुंबईत जे पाणी भरलं त्यासाठी पालकमंत्री जबाबदार नाही का? आदित्य ठाकरे यांचा सवाल

सोमवारी मुंबईत पाऊस झाला आणि अनेक ठिकाणी पाणी भरलं होतं. यासाठी कंत्राटदार जबाबदार असल्याचे पालिकेने म्हटले आहे. त्याचे पाण्याचे पंप वेळेत न लावल्याने या कंत्राटदारांवर 10 लाख रुपयांचा दंड आकारला आहे. पण यासाठी मुंबईचे पालकमंत्री जबाबदार नाही का असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे, नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे. तसेच या लोकांना शहर चालवता येत नाही असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, सरकार त्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकतील पण त्या तीन पालक मंत्र्यांचे काय? पालिकेत कार्यालयासाठी पालकमंत्री घुसखोरी करतील, पण मुंबईत जे पाणी भरलं ती पालकमंत्र्यांची जबाबदारी नाही?

तसेच पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे काय? मान्सूनपूर्व झालेल्या बैठकांचे काय? ज्या रस्ते घोटाळे आम्ही उघड करतोय त्याचे काय? इतरांवर जबाबदारी ढकलने सोपे आहे. हे लोक जबाबदारीपासून पळ काढू शकतात हे सिद्ध झाले. हे नेते शहर चालवू शकत नाहीत असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पहिल्याच पावसात केईएम रुग्णालयात पाणी साचलं, हाय कोर्टाकडून गंभीर दखल, बीएमसीला नोटीस पहिल्याच पावसात केईएम रुग्णालयात पाणी साचलं, हाय कोर्टाकडून गंभीर दखल, बीएमसीला नोटीस
मुंबईमध्ये दोन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाला, या पावसाचा मोठा फटका हा मुंबईकरांना बसला, पहिल्याच पावसामध्ये मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचलं....
आम्ही हल्ला करायच्या आधीच हिंदुस्थानने ब्रह्मोस मिसाईलने हल्ले केले, पाकिस्तानी पंतप्रधानांची कबूली
पाकिस्तानच्या विमानतळावर टॉयटेलाही पाणी नाही, अभिनेत्रीने केली स्वतःच्या देशाची पोलखोल
दक्षिण कोरियाच्या नौदलाचे विमान कोसळले, चार क्रू मेंबर्सचा मृत्यू
IMD Monsoon Update : पुढील 48 तास धोक्याचे, आणखी एक मोठं संकट, आयएमडीचा हाय अलर्ट
अरबाज खानला घटस्फोट देण्यापूर्वीच्या रात्री काय घडलं? मलायका अरोराने स्वतः सांगितली संपूर्ण कहाणी
दीपिकाची स्टेज 2 लिव्हर कॅन्सरशी लढाई सोपी नाही; शस्त्रक्रिया ढकलली पुढे