जयंत नारळीकरांना सरकारतर्फे कोण कोणत्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते?

जयंत नारळीकरांना सरकारतर्फे कोण कोणत्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते?

जेष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. पुण्यातील राहत्या घरी निधन झालं असून, आंतररष्ट्रीय स्तरावर त्यांची मोठी ख्याती होती. मुख्य म्हणजे जयंत नारळीकरांची ओळख ही मराठी विज्ञानकथा लिहीण्यासाठी प्रचलित होती. साध्या सोप्या भाषेमध्ये विज्ञानाची भाषा नारळीकरांनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली. जयंत नारळीकरांनी केंब्रिज विद्यापीठात शिक्षण घेतले होते. शिक्षणानंतर त्यांनी हिंदुस्थानात परतून, टाटा मुलभूत संशोधन संस्थेत काम केले होते. नाशिकमध्ये 2021 मध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते‌. आज (मंगळवार 20 मे) पहाटेच्या सुमारास झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली.

जयंत नारळीकर यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले होते. यामध्ये 1965 मध्ये जयंत नारळीकर यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते. 2004 मध्ये जयंत नारळीकर यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते. तसेच 2010 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने जयंत नारळीकर यांना गौरवण्यात आले होते. स्मिथ पुरस्कार (1962), पद्मभूषण (1965), ॲडम्स पुरस्कार (1967), शांतीस्वरूप पुरस्कार (1979), इंदिरा गांधी पुरस्कार (1990), कलिंग पुरस्कार (1996) आणि पद्मविभूषण (2004), महाराष्ट्र भूषण पुरस्कार (2010) यांसारख्या अनेक पुरस्कारांनी जयंत नारळीकर यांना सन्मानित करण्यात आले होते.

जयंत नारळीकर यांना 2014 साली मिळालेला तेनाली-हैदराबाद येथील नायुद‍अम्मा ट्रस्टचा डॉ. वाय. नायुद‍अम्मा स्मृती पुरस्कार-2013 देखील मिळाला होता. याबरोबरीने यांच्या ‘चार नगरांतले माझे विश्व’ या मराठी आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा 2014 सालचा पुरस्कार मिळाला होता. नारळीकरांनी लिहिलेल्या ‘यक्षांची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार प्राप्त झाला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भुजबळ मंत्री होताच गुणरत्न सदावर्तेंनी जरांगे पाटलांना डिवचलं, पहिली प्रतिक्रिया काय? भुजबळ मंत्री होताच गुणरत्न सदावर्तेंनी जरांगे पाटलांना डिवचलं, पहिली प्रतिक्रिया काय?
लोकसभा निवडणुकीत राज्यात बसलेल्या धक्क्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीनं राज्यात जोरदार पुनरागमन केलं होतं. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार पूर्ण बहुमतानं...
IMD Weather Forecast : पुढील 48 तास धोक्याचे, महाराष्ट्रावर मोठं संकट, आयएमडीचा रेड अर्लट
ममता कुलकर्णीनंतर ही स्टार अभिनेत्री साध्वी बनणार? इतका मोठा निर्णय घेण्यामागचं कारण काय?
लिची खाण्याची योग्य वेळ कोणती? आरोग्यास मिळतील दुप्पट फायदे
देशातील किती टक्के लोकांना पतंजलीची दंत कांती पसंत आहे?; 89 टक्के लोकांनी काय उत्तर दिलं?
पॅकेटमधील दूध कसे प्यावे उकळून की कच्चे? फायदेशीर काय?
Photo – तू हुस्न परी…