भाजप देशाची संपत्ती निवडक लोकांच्या हाती ठेवू इच्छिते – राहुल गांधी

भाजप देशाची संपत्ती निवडक लोकांच्या हाती ठेवू इच्छिते – राहुल गांधी

भाजपला देशाची संपत्ती निवडक लोकांच्या हातात जावी असे वाटते, असं विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले आहेत. कर्नाटकमधील समर्पण संकल्प रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी असं म्हणाले आहेत.

राहुल गांधी म्हणाले आहेत की, “आम्ही तुम्हाला सांगितले होते की, आम्ही कर्नाटकातील गरीब लोकांच्या बँक खात्यात पैसे टाकू आणि आज हजारो कोटी रुपये तुमच्या बँक खात्यात जात आहेत. तुम्ही हे पैसे तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी गुंतवत आहात. आम्हाला फक्त एवढेच हवे होते की, तुमचे पैसे तुमच्या खिशात परत जावेत. भाजपला देशाची संपत्ती निवडक लोकांच्या हातात जावी असे वाटते आणि आम्हाला कर्नाटकातील लोकांच्या खिशात पैसे जावे असे वाटते.”

ते म्हणाले, “जेव्हा आम्ही तुमच्या खिशात पैसे टाकतो तेव्हा ते पैसे बाजारात जातात. यामुळे लोक त्यांच्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये पैसे खर्च करतात. म्हणून उत्पादन वाढते, ज्यामुळे कर्नाटकच्या अर्थव्यवस्थेला फायदा होतो. भाजप मॉडेलमध्ये,निवडक लोकांना पैसे दिले जातात, जे पैसे खर्च करतात आणि हिंदुस्थानात न राहता परदेशात मालमत्ता खरेदी करतात.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मान्सूनबाबत आनंदाची बातमी; जे 16 वर्षांत नाही घडलं ते आता होणार,  हवामान विभागाचा नवा अंदाज काय? मान्सूनबाबत आनंदाची बातमी; जे 16 वर्षांत नाही घडलं ते आता होणार, हवामान विभागाचा नवा अंदाज काय?
अवकाळी पावसानं महाराष्ट्राला झोडपून काढलं आहे, पुणे, मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील तीन ते चार दिवस...
Mumbai rain : पहिल्याच पावसाने मुंबई लोकलला फटका आणि उपनगरात दाणादाण, कोकण रेल्वे मार्गावर झाड कोसळले
संजय राऊतांचा संपादकीय बॉम्ब, भुजबळांच्या मंत्रि‍पदावर चार शब्दांचं ट्विट, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
आंबेगाव तालुक्यात पावसाने थैमान, महाळूंगे पडवळ येथे कांद्याच्या बराखीवर वीज पडून शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान
पुण्यात वादळी वाऱ्यामुळे मोठे होर्डिंग कोसळले, 7 ते 8 दुचाकींचे नुकसान
Kolhapur News – कोल्हापूरात अवकाळी पावसाच थैमान; गटारी, नाले ओव्हरफ्लो अन् रस्ते जलमय
‘आप’ला आणखी एक धक्का, पक्षाच्या एकमेव ट्रान्सजेंडर नगरसेवकाचा राजीनामा; नवीन पक्षात प्रवेश