शक्तिपीठ महामार्गाला शिवसेनेचा तीव्र विरोध, विनायक राऊतांचे सरकारला आव्हान

शक्तिपीठ महामार्गाला शिवसेनेचा तीव्र विरोध, विनायक राऊतांचे सरकारला आव्हान

शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित प्रकल्पाला शिवसेनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. या महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या हजारो एकर जमिनींचे नुकसान होणार असून कोकणातील पर्यावरणाचा समतोल बिघडणार असल्याचा आरोप शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. तसेच या महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शक्तिपीठ महामार्ग सुमारे 800 किलोमीटर लांबीचा असून त्यासाठी 86 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या महामार्गामुळे शेतकऱ्यांची 27 हजार एकर शेतजमीन रस्त्याखाली जाणार आहे. तसेच, 300 फूट रुंदीच्या या महामार्गामुळे कोकणातील निसर्गाचे मोठे नुकसान होणार असल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला आहे. सिंधुदुर्गातील बारा गावांनी या महामार्गाला विरोध दर्शवला असून शिवसेना पक्षाचे सर्व कार्यकर्ते या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा संपर्क प्रमुख रुपेश राऊळ, तालुकाप्रमुख मायकल डिसोझा, रमेश गावकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

आंदोलन मोडून दाखवा

शिवसेनेचे डॉ. जयेंद्र परुळेकर हे या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. शासनाचा हा डाव हाणून पाडण्यासाठी आम्ही रणांगणात उतरलो आहोत. हिंमत असेल तर धमकी देणाऱ्यांनी आमचे आंदोलन मोडून दाखवावे, असे आव्हान विनायक राऊत यांनी विरोधकांना केले आहे.

विकासाला विरोध नाही

शिवसेनेचा विकासाला विरोध नाही, पण विकासाच्या नावाखाली जमिनी हडपणाऱ्यांना शिवसेनेचा विरोध आहे. शेतकऱ्यांना नामशेष करणारा शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही. हिंमत असेल तर या आमच्या तंगडय़ा तोडायला, असे आव्हानही विनायक राऊत यांनी विरोधकांना केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Chhagan Bhujbal : असा काय नाईलाज, सभ्य माणसं नाहीत का राजकारणात? छगन भुजबळ यांच्या शपथविधीपूर्वीच अंजली दमानिया यांची ती पोस्ट व्हायरल Chhagan Bhujbal : असा काय नाईलाज, सभ्य माणसं नाहीत का राजकारणात? छगन भुजबळ यांच्या शपथविधीपूर्वीच अंजली दमानिया यांची ती पोस्ट व्हायरल
ओबीसी चळवळीचा चेहरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत छगन भुजबळ आज सकाळी 10 वाजता राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. धनंजय मुंडे...
सर्वोच्च न्यायालयाचा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना धक्का, बाले शाह पीर दर्ग्याबाबत असे दिले आदेश
Rain Alert : राज्याला अवकाळी दणका, सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा जोर कायम
छगन भुजबळांना मंत्रिपद, आता धनंजय मुंडे यांचे पाच वर्ष कमबॅक नाही? काय मिळतात संकेत?
महानायक असून ‘त्या’ अभिनेत्रीसमोर का झुकले अमिताभ बच्चन, 31 वर्षांपूर्वी असं काय झालं होतं?
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये फक्त त्याची चूक नाही, मुलीसुद्धा..; आदित्य पांचोलीबद्दल काय म्हणाली पत्नी?
Breaking news – ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन