पॅकेटमधील दूध कसे प्यावे उकळून की कच्चे? फायदेशीर काय?

पॅकेटमधील दूध कसे प्यावे उकळून की कच्चे? फायदेशीर काय?

आपल्या शरीराला निरोगी राहण्यासाठी अनेक प्रकारच्या पोषक तत्वांची आवश्यकता असते, त्यापैकी एक आवश्यक पोषक तत्व म्हणजे कॅल्शियम. आपल्या हाडांना बळकटी देण्यासाठी कॅल्शियम खूप महत्वाचे आहे. कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी दूध हा सर्वोत्तम स्रोत मानला जातो. तुम्हाला प्रत्येक घरात दूध मिळेल. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी दूध सेवन करणे महत्त्वाचे असते असे म्हटले जाते.

पॅकेज्ड दूध कच्चे प्यावे की उकळून प्यावे?

दुधाचा शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. गाय आणि म्हशीचे दूध सर्वात फायदेशीर आहे. पण आजकाल आपण सगळेच बाजारातून दूधाचे पॅकेटच आणतो. काही लोक पॅकेज्ड दूध उकळून पितात तर काही लोक ते न उकळता सेवन करतात.त्यामुळे असा प्रश्न उद्भवतो की पॅकेज्ड दूध कच्चे पिणे जास्त फायदेशीर आहे की उकळलेले. याबद्दल तज्ञ नक्की काय सांगतात ते पाहुयात.

तज्ञांचे मत

पॅकेज केलेले अन्न घरी पोहोचण्यापूर्वी, ते अनेक प्रक्रियांमधून जाते, ज्याला पाश्चरायझेशन म्हणतात. आयुर्वेद तज्ञ किरण गुप्ता यांनी पॅकेज्ड दूध उकळून प्यावे की नाही याबद्दल काय सांगितले आहे ते जाणून घेऊयात. त्यांनी सांगितले की, पॅकेज्ड दूध हे उकळल्यानंतरच सेवन करावे. हे दूध कधी पॅक केले जाते आणि तुमच्या घरी कधी पोहोचते हे नक्की सांगणे तसे कठीण असते. अशा परिस्थितीत, त्यात बॅक्टेरिया वाढू शकतात. म्हणून, ते नेहमी उकळल्यानंतरच सेवन करावे.

किरण गुप्ता पुढे म्हणाले की “आपल्यापैकी ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनशक्ती मजबूत आहे ते कच्चे दूध देखील पिऊ शकतात. उदाहरणार्थ, व्यायाम करणारे लोक पॅकेजमधील कच्चे दूध पिऊ शकतात. कमकुवत पचनशक्ती आणि रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या इतर लोकांनी ते नेहमी उकळल्यानंतर प्यावे.”

दूध उकळूनच का प्यावे?

दूध उकळून प्यावे कारण त्यात असलेले बॅक्टेरिया आणि हानिकारक रसायने नष्ट होतात. त्याच वेळी, काही लोकांचा असाही विश्वास आहे की दूध उकळल्याने बॅक्टेरियाची प्रक्रिया देखील कमी होते आणि त्यामुळे दूध लवकर खराब होत नाही. तसेच, दूध नासण्याची शक्यता कमी होते.

पाश्चराइज्ड दुधाचे फायदे 

पॅकेज्ड दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत, ज्याला पाश्चराइज्ड दूध देखील म्हणतात. हे दूध दीर्घकाळ चांगले राहते, कारण त्यात असलेले हानिकारक जीवाणू पाश्चरायझेशन प्रक्रियेद्वारे नष्ट होतात. याशिवाय, त्यात फॅट्सचे प्रमाण देखील खूप कमी असते, ज्यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी ते फायदेशीर आहे. शिवाय, ते हाडांसाठी चांगले आहे.

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IPL 2025 – चेन्नईचा पुन्हा एकदा पराभव, राजस्थानने 6 विकेटने जिंकला सामना IPL 2025 – चेन्नईचा पुन्हा एकदा पराभव, राजस्थानने 6 विकेटने जिंकला सामना
आयपीएलमधून बाहेर फेकल्या गेलेल्या राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात राजस्थानने बाजी मारली आहे. चेन्नईने प्रथम फलंदाजी...
सरकारी कोट्यातील घराचे आमीष दाखवून 24 कोटींची फसवणूक, पुरूषोत्तम चव्हाण याला अटक
मान्सूनबाबत आनंदाची बातमी; जे 16 वर्षांत नाही घडलं ते आता होणार, हवामान विभागाचा नवा अंदाज काय?
Mumbai rain : पहिल्याच पावसाने मुंबई लोकलला फटका आणि उपनगरात दाणादाण, कोकण रेल्वे मार्गावर झाड कोसळले
संजय राऊतांचा संपादकीय बॉम्ब, भुजबळांच्या मंत्रि‍पदावर चार शब्दांचं ट्विट, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
आंबेगाव तालुक्यात पावसाने थैमान, महाळूंगे पडवळ येथे कांद्याच्या बराखीवर वीज पडून शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान
पुण्यात वादळी वाऱ्यामुळे मोठे होर्डिंग कोसळले, 7 ते 8 दुचाकींचे नुकसान