देशातील किती टक्के लोकांना पतंजलीची दंत कांती पसंत आहे?; 89 टक्के लोकांनी काय उत्तर दिलं?

देशातील किती टक्के लोकांना पतंजलीची दंत कांती पसंत आहे?; 89 टक्के लोकांनी काय उत्तर दिलं?

बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांची कंपनी पतंजली आयुर्वेद दंत कांती टूथपेस्ट आज भारतातील मोठ्या ब्रँड पैकी एक आहे. या ब्रँडची मार्केट व्हॅल्यू आजच्या तारखेला 500 कोटीहून अधिक आहे. सामान्य माणसाच्या घरात दिसणारा हा टूथपेस्ट लोकांना का आवडतो? याबाबतचा एक सर्व्हे करण्यात आला. त्यात लोकांनी अत्यंत वेगळी उत्तरे दिली आहेत.

पतंजली दंत कांती टूथपेस्ट कंपनीच्या सर्वात सुरुवातीच्या उत्पादनापैकी एक आहे. पूर्वी ते एक दंतमंजन होतं. आता त्याला टूथपेस्टचं स्वरुप आलं आहे. एवढंच नव्हे तर पतंजली टूथपेस्टने मार्केटमध्ये एवढा बदल घडवून आणला की, इतर अग्रगण्य एफएमसीजी कंपन्यांनाही आयुर्वेदीक टूथपेस्ट बाजारात आणावे लागले. त्यामुळेच हे टूथपेस्ट लोक पसंत करण्या मागची वेगवेगळी कारणं आहेत.

ब्रँडच्या इमेजने विश्वास वाढला

पतंजलि आयुर्वेदचा ब्रँडचे अ‍ॅम्बेसेडर स्वतः संस्थापक बाबा रामदेव आहेत. पतंजली दंत कांती ही टूथपेस्ट लोकांमध्ये लोकप्रिय होण्यात त्यांच्या प्रतिमेचा मोठा वाटा आहे. एका सर्वेनुसार, 89 टक्के लोक पतंजली दंत कांती फक्त त्याच्या ब्रँड लॉयल्टीमुळे खरेदी करतात. यावरून स्पष्ट होते की पतंजली दंत कांती वापरणारे ग्राहक पुन्हा पुन्हा हाच ब्रँड निवडतात. इतकेच नाही, पतंजली या ब्रँडबाबत लोकांची निष्ठा जिथे 89 टक्के आहे, तिथे इतर टूथपेस्ट ब्रँडसाठी ही निष्ठा फक्त 76 टक्के आहे.

बाबा रामदेव यांची प्रतिमा (ब्रँड अ‍ॅम्बेसेडर) पतंजली दंत कांती खरेदी करण्याच्या निर्णयावर कितपत प्रभाव टाकते, याविषयी विचारल्यावर 58 टक्के लोकांनी सांगितले की, ते बाबा रामदेव यांच्या प्रतिमेमुळेच दंत कांती खरेदी करण्यास प्रवृत्त होतात. तर इतर ब्रँडसाठी ही संख्या फक्त 32 टक्के आहे.

लोकांना दंत कांती का आवडते?

पतंजली दंत कांतीमध्ये असे काय आहे जे लोकांना आकर्षित करते? सर्वेनुसार, 41 टक्के लोक हे उत्पादन आयुर्वेदिक असल्यामुळे पसंत करतात. तर 22 टक्के लोक दात शुभ्र ठेवण्यासाठी आणि आणखी 22 टक्के लोक दात मजबूत राहण्यासाठी याचा वापर करतात. 15 टक्के लोकांना तोंडातील ताजगी यामुळे हे उत्पादन आवडते.

दंत कांती वापरल्यानंतरचा अनुभव पाहता, सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 36 टक्के लोकांनी समाधान व्यक्त केले, तर 31 टक्के लोक अत्यंत समाधानी होते. दुसऱ्या ब्रँडच्या बाबतीत हे समाधानाचे प्रमाण 30 टक्के होते आणि अत्यंत समाधानी असलेल्यांचे प्रमाण 34 टक्के होते. दोन्ही ब्रँडसाठी अनिश्चित राहणाऱ्या लोकांचे प्रमाण 21-22 टक्के इतके होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;