देशातील किती टक्के लोकांना पतंजलीची दंत कांती पसंत आहे?; 89 टक्के लोकांनी काय उत्तर दिलं?

देशातील किती टक्के लोकांना पतंजलीची दंत कांती पसंत आहे?; 89 टक्के लोकांनी काय उत्तर दिलं?

बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांची कंपनी पतंजली आयुर्वेद दंत कांती टूथपेस्ट आज भारतातील मोठ्या ब्रँड पैकी एक आहे. या ब्रँडची मार्केट व्हॅल्यू आजच्या तारखेला 500 कोटीहून अधिक आहे. सामान्य माणसाच्या घरात दिसणारा हा टूथपेस्ट लोकांना का आवडतो? याबाबतचा एक सर्व्हे करण्यात आला. त्यात लोकांनी अत्यंत वेगळी उत्तरे दिली आहेत.

पतंजली दंत कांती टूथपेस्ट कंपनीच्या सर्वात सुरुवातीच्या उत्पादनापैकी एक आहे. पूर्वी ते एक दंतमंजन होतं. आता त्याला टूथपेस्टचं स्वरुप आलं आहे. एवढंच नव्हे तर पतंजली टूथपेस्टने मार्केटमध्ये एवढा बदल घडवून आणला की, इतर अग्रगण्य एफएमसीजी कंपन्यांनाही आयुर्वेदीक टूथपेस्ट बाजारात आणावे लागले. त्यामुळेच हे टूथपेस्ट लोक पसंत करण्या मागची वेगवेगळी कारणं आहेत.

ब्रँडच्या इमेजने विश्वास वाढला

पतंजलि आयुर्वेदचा ब्रँडचे अ‍ॅम्बेसेडर स्वतः संस्थापक बाबा रामदेव आहेत. पतंजली दंत कांती ही टूथपेस्ट लोकांमध्ये लोकप्रिय होण्यात त्यांच्या प्रतिमेचा मोठा वाटा आहे. एका सर्वेनुसार, 89 टक्के लोक पतंजली दंत कांती फक्त त्याच्या ब्रँड लॉयल्टीमुळे खरेदी करतात. यावरून स्पष्ट होते की पतंजली दंत कांती वापरणारे ग्राहक पुन्हा पुन्हा हाच ब्रँड निवडतात. इतकेच नाही, पतंजली या ब्रँडबाबत लोकांची निष्ठा जिथे 89 टक्के आहे, तिथे इतर टूथपेस्ट ब्रँडसाठी ही निष्ठा फक्त 76 टक्के आहे.

बाबा रामदेव यांची प्रतिमा (ब्रँड अ‍ॅम्बेसेडर) पतंजली दंत कांती खरेदी करण्याच्या निर्णयावर कितपत प्रभाव टाकते, याविषयी विचारल्यावर 58 टक्के लोकांनी सांगितले की, ते बाबा रामदेव यांच्या प्रतिमेमुळेच दंत कांती खरेदी करण्यास प्रवृत्त होतात. तर इतर ब्रँडसाठी ही संख्या फक्त 32 टक्के आहे.

लोकांना दंत कांती का आवडते?

पतंजली दंत कांतीमध्ये असे काय आहे जे लोकांना आकर्षित करते? सर्वेनुसार, 41 टक्के लोक हे उत्पादन आयुर्वेदिक असल्यामुळे पसंत करतात. तर 22 टक्के लोक दात शुभ्र ठेवण्यासाठी आणि आणखी 22 टक्के लोक दात मजबूत राहण्यासाठी याचा वापर करतात. 15 टक्के लोकांना तोंडातील ताजगी यामुळे हे उत्पादन आवडते.

दंत कांती वापरल्यानंतरचा अनुभव पाहता, सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 36 टक्के लोकांनी समाधान व्यक्त केले, तर 31 टक्के लोक अत्यंत समाधानी होते. दुसऱ्या ब्रँडच्या बाबतीत हे समाधानाचे प्रमाण 30 टक्के होते आणि अत्यंत समाधानी असलेल्यांचे प्रमाण 34 टक्के होते. दोन्ही ब्रँडसाठी अनिश्चित राहणाऱ्या लोकांचे प्रमाण 21-22 टक्के इतके होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मान्सूनबाबत आनंदाची बातमी; जे 16 वर्षांत नाही घडलं ते आता होणार,  हवामान विभागाचा नवा अंदाज काय? मान्सूनबाबत आनंदाची बातमी; जे 16 वर्षांत नाही घडलं ते आता होणार, हवामान विभागाचा नवा अंदाज काय?
अवकाळी पावसानं महाराष्ट्राला झोडपून काढलं आहे, पुणे, मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील तीन ते चार दिवस...
Mumbai rain : पहिल्याच पावसाने मुंबई लोकलला फटका आणि उपनगरात दाणादाण, कोकण रेल्वे मार्गावर झाड कोसळले
संजय राऊतांचा संपादकीय बॉम्ब, भुजबळांच्या मंत्रि‍पदावर चार शब्दांचं ट्विट, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
आंबेगाव तालुक्यात पावसाने थैमान, महाळूंगे पडवळ येथे कांद्याच्या बराखीवर वीज पडून शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान
पुण्यात वादळी वाऱ्यामुळे मोठे होर्डिंग कोसळले, 7 ते 8 दुचाकींचे नुकसान
Kolhapur News – कोल्हापूरात अवकाळी पावसाच थैमान; गटारी, नाले ओव्हरफ्लो अन् रस्ते जलमय
‘आप’ला आणखी एक धक्का, पक्षाच्या एकमेव ट्रान्सजेंडर नगरसेवकाचा राजीनामा; नवीन पक्षात प्रवेश