मुंबईकरांची की कंत्राटदारांची, सरकार कोणाची सेवा करत आहे? आदित्य ठाकरे यांचा सवाल

मुंबईकरांची की कंत्राटदारांची, सरकार कोणाची सेवा करत आहे? आदित्य ठाकरे यांचा सवाल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांच्या सेवासुविधा आणि समस्यांबाबत आवाज उठवला आहे. तसेच देवनार डम्पिंग ग्राऊंड स्वच्छ करण्यासाठी मुंबईकरांचा पैसा का खर्च करण्यात येत आहे, असा सवालही त्यांनी केला. तसेच बेस्ट बसची दरवाढ याबाबतही त्यांनी सवाल उपस्थित केला आहे. हे सरकार नेमकी कोणाची सेवा करत आहे? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

याबाबत आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, जनतेचे पैसे देवनार डंपिंग ग्राउंड स्वच्छ करण्यासाठी खर्च केले जात आहेत. देवनार डम्पिंग ग्राऊंड अदानी समूहाच्या घशात घालण्यात आले आहे आणि ते स्वच्छ करण्यासाठी मुंबईकरांचे पैसे का खर्च करण्यात येत आहेत, असा सवालही त्यांनी केला.

या सरकारने बेस्ट बसेस वाचवण्यासाठी एकही रुपया खर्च केलेला नाही. त्यामुळे मुंबईकरांवर बेस्ट भाडेवाढ लादण्यात आली आहे. तसेच मुंबईकरांवर पहिल्यांदाच “कचरा संकलन वापरकर्ता शुल्क” म्हणून अदानी कर आकारण्यात येत आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला. आमच्या सरकारच्या काळात बेस्टच्या तिकिटांच्या किमती सर्वसामान्यांना परवडणाऱ्या होत्या, त्या आता महाग झाल्या आहेत. तसेच प्रवाशांची संख्याही कमी झाली आहे.त्याचप्रमाणे बेस्ट बसेसची संख्याही कमी होत आहे. त्यामुळे सरकार कोणाची सेवा करते? निश्चितच मुंबईकरांची नाही, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मधुमेहाच्या रुग्णांनी मनुका खाव्यात की खाऊ नये? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात मधुमेहाच्या रुग्णांनी मनुका खाव्यात की खाऊ नये? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जेव्हा मधुमेहाचा उपचार सुरू होतो तेव्हा डॉक्टर रुग्णाला काय खावे आणि...
IPL 2025 – चेन्नईचा पुन्हा एकदा पराभव, राजस्थानने 6 विकेटने जिंकला सामना
सरकारी कोट्यातील घराचे आमीष दाखवून 24 कोटींची फसवणूक, पुरूषोत्तम चव्हाण याला अटक
मान्सूनबाबत आनंदाची बातमी; जे 16 वर्षांत नाही घडलं ते आता होणार, हवामान विभागाचा नवा अंदाज काय?
Mumbai rain : पहिल्याच पावसाने मुंबई लोकलला फटका आणि उपनगरात दाणादाण, कोकण रेल्वे मार्गावर झाड कोसळले
संजय राऊतांचा संपादकीय बॉम्ब, भुजबळांच्या मंत्रि‍पदावर चार शब्दांचं ट्विट, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
आंबेगाव तालुक्यात पावसाने थैमान, महाळूंगे पडवळ येथे कांद्याच्या बराखीवर वीज पडून शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान