Chhagan Bhujbal : असा काय नाईलाज, सभ्य माणसं नाहीत का राजकारणात? छगन भुजबळ यांच्या शपथविधीपूर्वीच अंजली दमानिया यांची ती पोस्ट व्हायरल
ओबीसी चळवळीचा चेहरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत छगन भुजबळ आज सकाळी 10 वाजता राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्याच्या रिक्त खात्याचा कारभार भुजबळांच्या खाद्यांवर येईल. सत्तेत आल्यावर भुजबळांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे ते नाराज होते. आता ही नाराजी दूर होत आहे. तर नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्याविरोधात पुन्हा एकदा तोफ डागली आहे. त्यांनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करून मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यामुळे दमानिया यांनी भुजबळाविरोधात पुन्हा एकदा शड्डू ठोकल्याचे दिसून येते.
अंजली दमानिया यांची पोस्ट चर्चेत
छगन भुजबळ यांनी एक आठवड्यापूर्वीच मंत्री पदाबाबत ठरल्याची माहिती त्यांनी दिली. भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने नाशिकसह येवल्यात त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला आहे. तर दुसरीकडे आता त्यांच्याविरोधात अंजली दमानिया समोर आल्या आहेत. त्यांनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट लिहिली आहे. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खडा सवाल केला आहे.
छगन भुजबळ मंगळवारी सकाळी 10 वाजता राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेणार ?
वाह फडणवीस वाह !
म्हणजे एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार? जनता अशीच भरडली जमणा? की हा माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे, की तुम्ही आमच काहीच वाकड करू शकत नाही ?
असा… pic.twitter.com/dLj7MN79JE
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 20, 2025
असा काय नाईलाज?
दमानिया यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यात वाह फडणवीस वाह ! म्हणजे एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार? जनता अशीच भरडली जाणार? की हा माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे, की तुम्ही आमच काहीच वाकड करू शकत नाही? असा काय नाईलाज आहे ? की सभ्य माणसं मिळत नाहीत राजकारणात? अशी प्रश्नांची सरबत्ती करत त्यांनी मोठा धुराळा उडवून दिला.
आणि हो, हेच भुजबळ जेव्हा जेल मधे होते, तेव्हा एक अगदी बिचार्या सारखा फोटो माध्यमांमध्ये दाखवला जायचा. तेव्हा छातीत कळ यायची. मग आता ठणठणीत ? असा खोचक सवाल दमानिया यांनी केला. किळस वाटतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची कालच्या घोषणा आठवतात ? “भ्रष्टाचारीयो पर कारवाई के लिए, अब की बार ४०० पार”, “भ्रष्टाचार के खिलाफ मोदी सरकार के बडे कदम” हा आहे का तो बडा कदम ? ही ती कारवाई ?, असा खडा सवाल दमानिया यांनी भाजपाला विचारला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List