मुंबई, ठाण्यावर अचानक रेन स्ट्राईक; चाकरमान्यांची तारांबळ, पावसामुळे लोकलचा खोळंबा

मुंबई, ठाण्यावर अचानक रेन स्ट्राईक; चाकरमान्यांची तारांबळ, पावसामुळे लोकलचा खोळंबा

मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईसह राज्यभरात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. याचा मोठा फटका हा मुंबई शहराला बसला आहे. मंगळवारी मुंबईसह उपनगरांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. तर आज देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. या अवकळी पावसाचा मोठा फटका हा चाकरमान्यांना बसल्याचं पाहायला मिळत आहे. पावसामुळे लोकल ट्रेनला विलंब झाल्यामुळे ऑफिसला निघालेल्या आणि ऑफिसवरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

लोकल सेवेला फटका  

लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन मानली जाते. याच लाईफलाईनला आता पावसाचा मोठा फटका बसल्याचं दिसून येत आहे. गेल्या एका तासापासून मुंबईच्या उपनगर आणि शहर भागात सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मुंबईची लोकल सेवा विलंबाने सुरू आहे. पश्चिम रेल्वेवरची वाहतूक ही 5 ते 10  मिनिटांनी उशिरा सुरू आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पश्चिम रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर कापडाचा तुकडा आणि झाडच्या फांद्या पडल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक ही काही वेळेकरता बंद झाली होती. मात्र झाडाच्या फांद्या हटवण्यात आल्यानंतर रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत सुरू झाली आहे.

वादळी  वाऱ्यासह पाऊस 

मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे, अचानक आलेल्या या पावसामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारंबळ उडाली. अनेकजण छत्री न घेता तसेच घराबाहेर पडले होते. त्यामुळे पावसात भिजण्याची वेळ त्यांच्यावर आली. तर दुसरीकडे पावसामुळे लोकलचा देखील खोळंबा झाला. लोकल ट्रेन लेट झाल्यामुळे त्याचा मोठा फटका हा नोकरदार वर्गाला बसल्याचं दिसून आलं.

विरार -वसईमध्ये सोसाट्याचा वारा  

दरम्यान दुसरीकडे मंगळवारी रात्री विरार आणि वसईमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. या वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालं आहे, अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटल्या, बऱ्याच वेळ वीज पुरवठा देखील खंडित झाला होता. ऐन रात्री वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना याचा मोठा फटका बसला,  बागांचं देखील मोठं नुकसान झालं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

2030 पर्यंत माणूस खरच अमर होणार? काय आहे गूगलच्या माजी शास्त्रज्ञाचा दावा 2030 पर्यंत माणूस खरच अमर होणार? काय आहे गूगलच्या माजी शास्त्रज्ञाचा दावा
गूगलचे माजी शास्त्रज्ञ आणि प्रसिद्ध भविष्यवक्ता रे कुर्जवील यांनी सनसनाटी दावा केला आहे. 2030 पर्यंत नैनोरोबोट्सच्या मदतीने माणूस अमर होईल,...
छगन भुजबळ मंगळवारी घेणार मंत्रिपदाची शपथ, अन्न व नागरी पुरवठा खात्याची मिळणार जबाबदारी?
IPL 2025 – अभिषेक शर्माच वादळ पुन्हा एकदा गोंगावलं, हैदराबादने लखनऊला नमवलं; 6 विकेटने केला पराभव
‘धादांत खोट्या बातम्या दिल्या गेल्या…’, ऑपरेशन सिंदूरबाबत पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?
सरन्यायाधीशांच्या अवमानास कोण जबाबदार? याची चौकशी करून कारवाई करावी; रोहित पवार यांची मागणी
Latur News – लातूर बार्शी रोडवर ट्रॅक्टर आणि रिक्षाचा भीषण अपघात, 3 ठार; 3 गंभीर जखमी
India Tour of England – टीम इंडियाविरुद्ध दमदार कामगिरी करण्यासाठी अष्टपैलू खेळाडू सज्ज, दारू सोडल्याची केली मोठी घोषणा