पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद झाल्याने एअर इंडियाला बसणार फटका; होणार कोट्यवधींचं नुकसान

पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद झाल्याने एअर इंडियाला बसणार फटका; होणार कोट्यवधींचं नुकसान

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. दरम्यान, पाकिस्तानने 23 मे पर्यंत आपले हवाई क्षेत्र बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानच्या या निर्णयाचा परिणाम हिंदुस्थानातील विमानांवरही दिसून येतो. याबाबत एअर इंडियाने केंद्र सरकारला पत्र लिहले आहे. पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे, विमान कंपनीला 12 महिन्यांत सुमारे 60 कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते, असे एअर इंडियाने पत्रात म्हटले आहे.

वाढता इंधन खर्च आणि प्रवासाला लागणारा जास्त वेळ यामुळे हिंदुस्थानातील विमान कंपन्यांवर परिणाम होत आहे. विमान कंपन्यांना होत असलेल्या तोट्याच्या पार्श्वभूमीवर, एअर इंडियाने सरकारकडून प्रमाणित अनुदानाची मागणी केली आहे. एअर इंडियाने विमान वाहतूक मंत्रालयाला दिलेल्या पत्राचा हवाला देत असे रॉयटर्सने आपल्या वृत्तात ही माहिती दिली.

प्रभावित आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी अनुदान हा एक चांगला, पडताळणीयोग्य आणि न्याय्य पर्याय आहे. परिस्थिती सुधारल्यावर अनुदान बंद करता येईल, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

प्रोटीन शेक कधी प्यावे – वर्कआऊट करण्यापूर्वी की नंतर? तज्ज्ञांकडून जाणून घ्या प्रोटीन शेक कधी प्यावे – वर्कआऊट करण्यापूर्वी की नंतर? तज्ज्ञांकडून जाणून घ्या
आपल्या शरीरासाठी अनेक मॅक्रोन्यूट्रिएंट्स आवश्यक आहेत, त्यापैकी एक म्हणजे प्रथिने. प्रथिने शरीरात बिल्डिंग ब्लॉक्स म्हणून काम करणाऱ्या अनेक अमीनो आम्लांपासून...
healthy lifestyle: केळी खाताना तुम्ही सुद्धा ‘या’ चुका करत नाहीत ना? आरोग्यावर होईल गंभीर परिणाम…
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मामाच्या गावी आले, नदीत अंघोळीसाठी गेले अन् सहाही जण बुडाले
इस्रायलच्या जंगलात भीषण आग, देशात आणीबाणी जाहीर
तहव्वूर राणाकडून लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवादी योजनांची माहिती मिळू शकते, एनआयएचा दिल्ली कोर्टात दावा
‘WAVES 2025… क्रिएटिव कॉन्टेंटचे लॉन्चिंग पॅड बनतंय…’ सुपरस्टार अल्लू अर्जुनकडून गौरव
IPL 2025 – मुंबईने राजस्थानला लोळवलं; 100 धावांनी केला पराभव, पटकावला पहिला क्रमांक