Summer Juice- गाजर ज्यूस उन्हाळ्यातील सर्वात महत्त्वाचा ज्यूस का आहे? वाचा गाजराचा ज्यूस पिण्याचे फायदे

Summer Juice- गाजर ज्यूस उन्हाळ्यातील सर्वात महत्त्वाचा ज्यूस का आहे? वाचा गाजराचा ज्यूस पिण्याचे फायदे

शेफ विष्णू मनोहर यांच्या मते गाजराचा ज्यूस हा हिवाळ्यासोबत उन्हाळ्यातील पिणे खूप गरजेचे आहे. गाजराचा ज्यूस पिण्याचे फायदे सर्वात आधी आपण जाणून घेऊया. त्यानंतर पाहुया गाजराच्या ज्यूसची विष्णू मनोहर यांची रेसिपी.

गाजराचा ज्यूस पिण्याचे फायदे

 

गाजराच्या रसात पोटॅशियमची मात्रा खूप असते. पोटॅशियम आपल्या हद्यासाठी खूप उत्तम मानले जाते. यामुळे रक्तदाब देखील नियंत्रणात राहतो. तसेच हृदयविकाराचा धोकाही खूप कमी होतो.

 

वजन कमी करणाऱ्यांसाठी गाजराचा ज्यूस हा खूप महत्त्वाचा मानला जातो. गाजराच्या रसात कॅलरीज कमी असतात. यामुळेच वजन कमी करण्यास मदत होते.

 

 

गाजराचा रस शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतो, ज्यामुळे यकृत निरोगी राहते.

 

 

 

 

गाजराच्या रसात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के असते, जे हाडे मजबूत करण्यासाठी आवश्यक आहेत.

 

 

गाजरामध्ये व्हिटॅमिन ए आणि अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. तसेच गाजराचा ज्यूस पिण्यामुळे त्वचेवरील डाग कमी होतात. तसेच त्वचेला चमकही येते.

 

गाजराच्या रसामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी खूप आवश्यक मानले जाते. यामुळे दृष्टी सुधारण्यास खूप मदत होते.

 

 

गाजराचे ज्यूस

साहित्य – गाजर 200 ग्रॅम, आवळा 1 नग, आलं 1 इंच (तुकडा), जेष्ठमध पावडर अर्धा चमचा, मीठ चवीनुसार.

कृती – गाजर स्वच्छ धुऊन, सोलून त्यामधे आवळा, आलं, जेष्ठमध पावडर घालून मिक्सरमध्ये बारीक करा. सर्व करतेवेळी चाळणीने न गाळता तसेच सर्व्ह करावे. त्यामुळे फायबर सुद्धा पोटात जातात. वाटल्यास चवीनुसार मीठ व साखर घालावी.

 

 

 

 

 

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

WAVES 2025: ‘पुष्पा 2’ नंतर किती बदललं अल्लू अर्जुनचं आयुष्य ? पुष्पा ने थेट सांगितलं… WAVES 2025: ‘पुष्पा 2’ नंतर किती बदललं अल्लू अर्जुनचं आयुष्य ? पुष्पा ने थेट सांगितलं…
मुंबईत वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट समिट सुरू झाले आहे. या चार दिवसांच्या कार्यक्रमात अनेक मोठे स्टार सहभागी होणार असून...
कथित गर्लफ्रेंड पलक तिवारीच्या भावासोबत इब्राहिम अली खानची मस्ती; व्हिडीओ व्हायरल
skincare tips : उन्हाळ्यात चमकदार त्वचेसाठी सनस्क्रीन वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या….
IPL 2025 – पंजाब किंग्जच्या सुसाट गाडीला ब्रेक लागणार? महत्त्वाचा खेळाडू स्पर्धेतून बाहेर
लोकसभा- विधानसभा निवडणुकीनंतर निवडणूक आयोगाला जाग, मतदार यादीबाबत घेतले मोठे निर्णय
पाच मित्र पोहत होते, अचानक दगडी विहीर कोसळली; तिघांना वाचवण्यात यश, दोघे ढिगाऱ्याखाली अडकले
ठरलं! ‘या’ मैदानावर रंगणार फायनलचा थरार, ICC ने केली मोठी घोषणा