IPL 2025 – मुंबईने राजस्थानला लोळवलं; 100 धावांनी केला पराभव, पटकावला पहिला क्रमांक

IPL 2025 – मुंबईने राजस्थानला लोळवलं; 100 धावांनी केला पराभव, पटकावला पहिला क्रमांक

मुंबईने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत राजस्थानचा तब्बल 100 धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने राजस्थानला 218 धावांच आव्हान दिलं होतं. रायन रिकेलटन (38 चेंडू 61 धावा), रोहित शर्मा (36 चेंडू 53 धावा) हार्दिक पंड्या (23 चेंडू 48 धावा) आणि सूर्यकुमार यादव (23 चेंडू 48 धावा) या चौघांनी राजस्थानची अक्षरश: धुलाई केली. राजस्थानला जिंकण्यासाठी 218 धावांची गरज होती. मागचा सामना जिंकल्यामुळे राजस्थान कडवी झुंज देणार, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. परंतु मुंबईच्या गोलंदाजांनी राजस्थानला चितपट केलं. ट्रेंन्ट बोल्ट आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराहने 2, दीपक चहर आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी 1-1 विकेट घेत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली. मुंबईच्या भेदक माऱ्यापुढे राजस्थानचा संघ 117 धावांमध्येच गार झाला. या विजयासह मुंबईने 14 गुणांची कमाई करत गुणतालिकेत पहिला क्रमांक पटकावला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मेट्रो आणि समृद्धीला मोदींचा ‘थांबा’, पंतप्रधान आले… गेले, उद्घाटनांचा मुहूर्त टळला मेट्रो आणि समृद्धीला मोदींचा ‘थांबा’, पंतप्रधान आले… गेले, उद्घाटनांचा मुहूर्त टळला
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी मुंबईत आले आणि ‘वेव्हज समिट’ला हजेरी लावून तेथूनच माघारी परतले. पंतप्रधान मुंबई दौऱ्यावर असताना महाराष्ट्र दिनाच्या...
महामार्गावर कोंडीमारा! मुंबई-पुणे एक्प्रेस वेवर, तब्बल 10 किलोमीटरच्या रांगा
मालवणमधील शिवपुतळ्याचे लोकार्पण लांबणीवर
संगममाहुली येथील महाराणी येसूबाई, रणरागिणी ताराराणी तसेच छत्रपती पहिले शाहू महाराज यांच्या समाधींचे जतन करा
सुप्रीम कोर्ट फक्त श्रीमंतांसाठी नाही! गुजरातच्या कंपनीला न्यायालयाने फटकारले
पोलिसांनी वर्षभरात 87 मुलांची मजुरीच्या दलदलीतून सुटका
अवयव प्रत्यारोपणासाठी आगाऊ नोंदणी हवी, हायकोर्टाची महत्त्वपूर्ण सूचना; राज्य शासनाला प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश