विरोधी पक्षाच्या दबावामुळे जातनिहाय जनगणनेचा निर्णय, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्याकडून केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत

विरोधी पक्षाच्या दबावामुळे जातनिहाय जनगणनेचा निर्णय, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्याकडून केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत

विरोधी पक्षाच्या दबावामुळे केंद्र सरकारला जातनिहाय जनगणना करावी लागली अशी टीका तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी केली. तसेच तेलंगणा सरकारने आधी हा निर्णय घेतला आणि ओबीसींचे सशक्तिकरणासाठी देशाला प्रेरणा मिळाली असेही रेड्डी म्हणाले.

मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी म्हणाले की विरोधी पक्षांच्या दबावामुळे केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला. यावर आम्ही राजकारण करणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. जर सरकारला खरंच जातीनिहाय जनगणना करायची असेल तर सरकारने आधी केंद्रीय मंत्र्यांची आणि तज्ज्ञांची एक समिती नेमावी.

तसेच तेलंगाणात काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यावर आम्ही जातनिहाय जनगणना करून दाखवली. त्यानंतर केंद्र सरकारनेही जातनिहाय जनगणना करावी असा प्रस्ताव आम्ही विधानसभेत मंजूर केला. जर सरकारने ही जनगणना केली नाही तर देशाने कधीच भाजपला माफ केलं नसतं असेही रेड्डी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘सर्जिकल स्ट्राईक नको, आता थेट सर्जरीच…’, पहलगाम हल्ल्यावर भुजबळ काय म्हणाले? ‘सर्जिकल स्ट्राईक नको, आता थेट सर्जरीच…’, पहलगाम हल्ल्यावर भुजबळ काय म्हणाले?
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे. भारतानं घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर आता पाकिस्तानवर चांगलाच दबाव वाढला आहे....
WAVES 2025: 10 व्या चित्रपटानंतर अल्लू अर्जुनचा मोठा अपघात, 6 महिने घरात बसण्याचा सल्ला पण..
Javed Akhtar : आता आर नाही तर पार… लक्षात राहील असं उत्तर द्या,अद्दल घडवा ! पहलगाम हल्ल्यानंतर संतप्त जावेद अख्तर यांची सरकारकडे मागणी
कलिंगड खरेदी करताना या ‘पाच’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर तुमचे आरोग्य येऊ शकते धोक्यात!
‘पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना शहीदांचा दर्जा द्यावा, राहुल गांधींची पंतप्रधान मोदींकडे मागणी
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद झाल्याने एअर इंडियाला बसणार फटका; होणार कोट्यवधींचं नुकसान
Ratnagiri News – ‘टॉवर लावलाय नावाला अन् रेंज नाही गावाला’, BSNL च्या भोंगळ कारभाराने गावकरी त्रस्त