लष्कराचं मनोबल कमी करू नका! पहलगाम हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी SC ने फेटाळली

लष्कराचं मनोबल कमी करू नका! पहलगाम हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी SC ने फेटाळली

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ही वेळ याचिका दाखल करण्याची नाही. लष्कराचे मनोबल कमी करू नका, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेण्यास नकार दिला आणि याचिकाकर्त्याला चांगलेच फटकारले.

पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. यात महाराष्ट्रातील 6 जणांचाही समावेश होता. या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरून गेला होता. या दहशतवादी हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करण्याची जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र यावर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. तसेच या प्रकरणांच्या चौकशीमध्ये न्यायाधीश तज्ज्ञही नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.

पहलगाम हल्ल्याची न्यायालयीन चौकशीची मागणी करणारी याचिका करण्यापूर्वी या प्रकरणाची संवेदनशीलता पहायला हवी होती. तुमचेही देशाप्रती काही कर्तव्य आहे. ही वेळ याचिका दाखल करण्याची नाही, तर प्रत्येक देशवासियाने दहशतवादाविरुद्ध लढण्याची आहे. यामुळे लष्कराचे मनोबल कमी होऊ शकते, अशा शब्दाच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला फटकारले.

तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांना चौकशी करण्यास सांगत आहात. पण अशा प्रकरणाची चौकशीमध्ये न्यायाधीश तज्ज्ञ नाही. ते फक्त निर्णय घेऊ शकतात, त्यामुळे आम्हाला आदेश देण्यास सांगू नका, असेही न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारले. याचिकाकर्त्याने पहलगाम हल्ल्याची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची मागणी केली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘सर्जिकल स्ट्राईक नको, आता थेट सर्जरीच…’, पहलगाम हल्ल्यावर भुजबळ काय म्हणाले? ‘सर्जिकल स्ट्राईक नको, आता थेट सर्जरीच…’, पहलगाम हल्ल्यावर भुजबळ काय म्हणाले?
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे. भारतानं घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर आता पाकिस्तानवर चांगलाच दबाव वाढला आहे....
WAVES 2025: 10 व्या चित्रपटानंतर अल्लू अर्जुनचा मोठा अपघात, 6 महिने घरात बसण्याचा सल्ला पण..
Javed Akhtar : आता आर नाही तर पार… लक्षात राहील असं उत्तर द्या,अद्दल घडवा ! पहलगाम हल्ल्यानंतर संतप्त जावेद अख्तर यांची सरकारकडे मागणी
कलिंगड खरेदी करताना या ‘पाच’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर तुमचे आरोग्य येऊ शकते धोक्यात!
‘पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना शहीदांचा दर्जा द्यावा, राहुल गांधींची पंतप्रधान मोदींकडे मागणी
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद झाल्याने एअर इंडियाला बसणार फटका; होणार कोट्यवधींचं नुकसान
Ratnagiri News – ‘टॉवर लावलाय नावाला अन् रेंज नाही गावाला’, BSNL च्या भोंगळ कारभाराने गावकरी त्रस्त