पहलगाम हल्ल्यामुळे जम्मू-कश्मीरमधील लोक सर्वाधिक त्रस्त – फारुख अब्दुल्ला

पहलगाम हल्ल्यामुळे जम्मू-कश्मीरमधील लोक सर्वाधिक त्रस्त – फारुख अब्दुल्ला

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. यातच जम्मू कश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे (जेकेएनसी) प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर भाष्य करताना म्हटलं आहे की, “पहलगाममधील घटना खूप वेदनादायक आहे. या हल्ल्यामुळे जम्मू आणि कश्मीरमधील लोक सर्वाधिक त्रस्त आहेत.”

पहलगाम हल्ल्याबाबत फारुख अब्दुल्ला म्हणाले की, “हा हल्ला सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणेतील त्रुटींमुळे घडला यात काहीच शंका नाही. येथे आपण आपले जीवन खूप चांगल्या प्रकारे जगत आहोत, हे पाकिस्तानला आवडत नाही. आमच्या लोकांमध्येही चुकीची माहिती पसरवली गेली. म्हणूनच पाकिस्तानने हा हल्ला केला. परंतु याचा हिंदुस्थानातील मुस्लिमांवर काय परिणाम होणार आहे, याकडे त्यांनी लक्ष दिले नाही.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;