आसामचे मुख्यमंत्री हे देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, राहुल गांधींचा हिमंता बिस्वा सरमांवर हल्लाबोल

आसामचे मुख्यमंत्री हे देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, राहुल गांधींचा हिमंता बिस्वा सरमांवर हल्लाबोल

आसामचे मुख्यमंत्री हे देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, त्यांना तुरुंगात पाठवू, असं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले आहेत. राहुल गांधी हे आसाम दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना लक्ष्य केलं आहे.

यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले, “आसामचे मुख्यमंत्री स्वतःला राजा समजतात, पण ते फार काळ सत्तेत राहणार नाहीत. ते तुरुंगात जाणार, काँग्रेसला हवे म्हणून नाही तर, आसामचे लोक त्याला भ्रष्टाचारासाठी तिथे पाठवतील म्हणून.”

राहुल गांधी यांनी 2026 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी आसाममधील काँग्रेसच्या नव्या नेतृत्वाचे कौतुक करत जनतेच्या पाठिंब्यावर विश्वास दर्शवला. त्यांनी सरमा यांना हिंदुस्थानातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री संबोधले आणि भाजपवर मतदार यादीत फेरफार केल्याचा आरोप केला. “भाजप आणि निवडणूक आयोग एकत्र काम करत आहेत. महाराष्ट्रात त्यांनी निवडणूक चोरली आणि आता बिहारातही तेच करायचा प्रयत्न करत आहेत,” राहुल असे गांधी यांनी यावेळी म्हणाले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Dhule News – कर्ज व्याज परताव्यासाठी लाचेची मागणी, जिल्हा समन्वयकाला अटक Dhule News – कर्ज व्याज परताव्यासाठी लाचेची मागणी, जिल्हा समन्वयकाला अटक
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये सर्व सामान्य माणसांना सरकारच्या नाकर्तेपणामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात भर म्हणून सरकारी कर्मचारी सुद्धा...
खासदार संजय राऊत यांनी अहिल्यानगर महानगरपालिकेतील घोटाळा उघड करत दिला दणका; पालकमंत्री विखेंच्या कार्यालयाला आली जाग
IND Vs ENG 3rd Test – सामना जिंकूनही इंग्लंडला ICC ने ठोठावला दंड, WTC गुणतालिकेतही बसला फटका
मी पुन्हा येईन! समारोपाचे अंबादास दानवे यांचे जोरदार भाषण
Nanded News – जम्मू काश्मीरच्या राज्यपालांनी राजीनामा द्यावा, पहलगाम हल्ल्यावरून ओवेसी यांची मागणी
बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर चिंता करु नका, रामदेव बाबांनी सांगितला सोपा उपाय
Nanded News – वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडीतर्फे आमदार हेमंत पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारले; अर्बन नक्षलवादाच्या वक्तव्याचा निषेध