Bihar Election 2025 – राज्यातील 20 टक्के मतदारांवर कात्री चालवण्याचा प्रयत्न, निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद; काँग्रेसचा गंभीर आरोप

Bihar Election 2025 – राज्यातील 20 टक्के मतदारांवर कात्री चालवण्याचा प्रयत्न, निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद; काँग्रेसचा गंभीर आरोप

बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या विशेष गहन पुनरीक्षणाचा निर्णय घेतला आहे. यामुळे मतदार यादीतून 20 टक्के मतदारांची नावे वगळण्यात येऊ शकतात. यावर काँग्रेस पक्षाने तीव्र आक्षेप नोंदवला असून हा निर्णय गरीब, दलित, मागासवर्गीय आणि स्थलांतरित कामगारांच्या मतदार यादीतील नावे हटवण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे.

यावरच आज दिल्लीतील इंदिरा भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बिहार काँग्रेसचे अध्यक्ष राजेश राम यांनी म्हटलं आहे की, “22 वर्षांपूर्वी मतदार यादीचे संगणकीकरण झाल्यापासून इतकी सखोल तपासणी कधीही झाली नाही. पूर्वी नागरिकत्व सिद्ध करण्याची आवश्यकता नव्हती, आता पालक आणि आजोबांचेही कागदपत्रे मागितली जात आहेत. बिहारमधील तीन कोटींहून अधिक लोक कामासाठी देशभरात स्थलांतरित झाले आहेत. जर ते निर्धारित वेळेत घरी परतू शकले नाहीत तर त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट केली जाणार नाहीत. भाजपला थेट फायदा व्हावा म्हणून ही प्रक्रिया अवलंबण्यात आली आहे.”

राजेश राम पुढे म्हणाले, “वंचित राहणारे लोक बहुतेक गरीब, दलित, मागासवर्गीय लोक आहेत. हे लोक पारंपारिकपणे महाआघाडी आणि इंडिया आघाडीला मतदान करतात. याचा थेट राजकीय फायदा भाजपला मिळेल.” ते म्हणाले की, “मतदार यादीतून नावे वगळल्याने केवळ मतदानावर परिणाम होणार नाही तर पेन्शन, जॉब कार्ड आणि इतर सरकारी योजनांवरही परिणाम होईल. भाजपला जिथे फायदा दिसतो तिथे आधार अनिवार्य करतो. मग मतदार यादीत आधार लिंक का स्वीकारत नाही? ते सर्वत्र आधारशी जोडले गेले आहे, परंतु मतदानाच्या वेळी त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.”

महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही मतदार यादीचा झोल; फेरतपासणीला इंडिया आघाडीने घेतला आक्षेप;निवडणूक आयुक्तांसोबत तीन तास वादळी चर्चा

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हॉस्पिटल बिल भरताना नेहमी काय चेक केलं पाहिजे? तुमची कशी फसवणूक करतात त्यासाठी हे वाचा हॉस्पिटल बिल भरताना नेहमी काय चेक केलं पाहिजे? तुमची कशी फसवणूक करतात त्यासाठी हे वाचा
सध्या वैद्यकीय खर्च दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर उपचारांपेक्षा जास्त चिंता अंतिम बिलाच्या रकमेची वाटते. अनेकवेळा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज...
लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी; 2,289 महिलांना योजनेतून वगळले, आदिती तटकरेंची माहिती
Kolhapur News – संतापजनक! भरपावसात रुग्णालयाबाहेर मृतदेह उघड्यावरच; वैद्यकीय शिक्षण मंत्री-आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच धक्कादायक प्रकार
Ratnagiri News – रत्नदुर्ग किल्ल्यावरील घटना प्रेमप्रकरणातूनच; हरियाणावरून आलेल्या वडिलांनी मुलीची चप्पल, जॅकेट ओळखले
Pandharpur Wari 2025 – माउलींच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधू भेट, संतांच्या पालख्यांचा पंढरपूर तालुक्यात प्रवेश
शिवसेना-मनसेच्या मुंबईतील विजयी मेळाव्याला शरद पवार यांचा पाठिंबा
तुम्हीपण तुमच्या मुलांना केचपसोबत चपाती-पराठा देता का? नुकसान माहितीये का?