सत्ता येते-जाते, तुम्ही भाजपचे गुलाम का बनताय? काँग्रेसचा निवडणूक आयोगाला इशारा
आम्ही निवडणूक आयोगाला भेटण्यासाठी वेळ मागितला. ज्या व्यक्तीमार्फत वेळ मागितला गेला तो अनधिकृत आहे, असे सांगून निवडणूक आयोगाने आमचा अपमान केला, असा संताप काँग्रेसच्या पवन खेडा यांनी व्यक्त केला.
निवडणूक आयोगाला भेटल्यानंतर आम्हाला जाणवले की आम्ही चुकीच्या पत्त्यावर गेलो आहोत. निवडणूक आयोगाला स्वतःच्या इमारतीत बसण्याची गरज नाही. भाजपचे एक मोठे मुख्यालय आहे, त्यांनी तिथे एक मजला व्यापून तिथे बसावे. निवडणूक आयोग मध्यस्थ असेल तर, आम्ही मध्यस्थांना का भेटावं? आम्ही थेट भाजपशी बोलू, अशी टीका पवन खेडा यांनी केली.
हमने चुनाव आयोग से मिलने का समय मांगा। चुनाव आयोग द्वारा हमें अपमानजनक रूप से कहा गया कि जिस व्यक्ति के माध्यम से समय मांगा गया है- वो अनाधिकृत है।
हमें चुनाव आयोग से मिलकर आभास हुआ कि हम गलत पते पर चले गए हैं। चुनाव आयोग को अपनी खुद की बिल्डिंग में बैठने की जरूरत नहीं है। BJP… pic.twitter.com/5IAfuAbBuz
— Congress (@INCIndia) July 3, 2025
पण निवडणूक आयोग कोणत्याही पक्षासाठी मध्यस्थ होऊ शकत नाही. प्रत्येकाने त्यांच्या मर्यादेत काम करावे, ही लोकशाहीची व्याख्या आहे. सत्ता येते आणि जाते. तुम्ही भाजपचे गुलाम का बनताय? असा सवाल करत पवन खेडा यांनी निवडणूक आयोगाला इशारा दिला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List