कराड-चिपळूण मार्गावरील वाहतूक दुसऱ्या दिवशीही ठप्प, दुसरा पूलही वाहून गेला; बस सेवा अजूनही बंदच

कराड-चिपळूण मार्गावरील वाहतूक दुसऱ्या दिवशीही ठप्प, दुसरा पूलही वाहून गेला; बस सेवा अजूनही बंदच

कराड-चिपळूण मार्गावरील वाहतूक दुसऱया दिवशीही ठप्प झाली असून, मागील 24 तासांपासून अवजड वाहने जागेवरच अडकून पडली आहेत. सलग दुसऱया दिवशी भराव पूल वाहून गेल्याने कोकणात जाणारी एसटी वाहतूक तसेच मालवाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.

पाटण तालुक्यातील वाजेगाव येथे भराव पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेला होता. त्यानंतर आज शिरळ गावाजवळील दुसरा भराव पूलही पाण्याच्या प्रवाहात नष्ट झाला. परिणामी, कराड-चिपळूण मार्गावरील दोन्ही महत्त्वाचे मार्ग बंद असून, या मार्गावरून जाणारी अवजड वाहने 24 तासांहून अधिक काळ एकाच जागी उभी आहेत.

या परिस्थितीचा फटका एसटी सेवेलाही बसला असून, चिपळूणकडे जाणाऱया एसटी बसेस पाटण आगारातच उभ्या ठेवण्यात आल्या आहेत. नागरिक व प्रवाशांचे मोठे हाल सुरू असून, पर्यायी मार्ग नसल्याने वाहतुकीची अडचण निर्माण झाली आहे.

गेल्या आठ ते दहा वर्षांपासून कराड-चिपळूण मार्गावरील पाटण ते कोयनानगर या दरम्यानच्या सुमारे 10 किलोमीटर अंतरावरील रस्त्याचे काम रखडले आहे. ठेकेदारांची निक्रिय भूमिका, प्रशासनाचे दुर्लक्ष व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे हे काम लांबणीवर पडले आहे, असा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दही, मीठ टाकून खावे की साखर घालून? 99 टक्के लोकांना कुठे माहितीये उत्तर? दही, मीठ टाकून खावे की साखर घालून? 99 टक्के लोकांना कुठे माहितीये उत्तर?
दह्यात अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे भारतीय थाळीत दह्याला महत्त्वाचे स्थान आहे. काही लोकांना तर ताटात दही नसेल तर जेवल्यासारखे...
Matcha ग्रीन टी म्हणजे काय? तुम्ही दररोज प्याल तर तुम्हाला मिळतील ‘हे’ फायदे
पावसाळ्यात कोरड्या आणि फ्रिजी केसांसाठी ‘हे’ हेअर मास्क ठरतील फायदेशीर
Diabetes चे रुग्ण असाल तर असा खा आंबा, Blood Sugar वाढणार नाही
डायबिटीज रुग्णांसाठी फळ आणि फळांचा रस यापैकी काय आहे जास्त फायदेशीर? जाणून घ्या
कैद्यांचे ससूनमधील ‘मेडिकल टुरिझम’ बंद करणार! पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा
Monsoon Soup – पावसाळी वातावरणात गरमागरम पालक सूप पिण्याचे हे आहेत आरोग्यवर्धक फायदे, वाचा