किल्ले रायगडावर यावर्षी मावळ्यांची कूच सुरक्षित होणार; उंच कड्यावरील सुटलेले दगड युद्धपातळीवर काढणार

किल्ले रायगडावर यावर्षी मावळ्यांची कूच सुरक्षित होणार; उंच कड्यावरील सुटलेले दगड युद्धपातळीवर काढणार

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त हजारो मावळे रायगड किल्ल्यावर कूच करतात. मात्र दरवर्षी पावसाळ्यात उंच कड्यावरील दरड कोसळून शिवभक्तांना दुखापत झाल्याच्या घटना समोर आल्या आहे. त्यामुळे शिवभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रशासनाने उंच कड्यावरील सुटलेले दगड काढण्यास सुरुवात केली आहे. यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात तारीख व तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार असल्याने युद्धपातळीवर ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे किल्ले रायगडावर मावळ्यांची कूच यावेळी सुरक्षित होणार आहे.

शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार ६ जून व तिथीनुसार ९ जून रोजी पार पडणार आहे. त्यामुळे हजारो मावळे किल्ले रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करणार आहेत. २०२३ मध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त अभिवादन करण्यासाठी आलेल्या एका शिवभक्ताचा अंगावर भलामोठा दगड कोसळून मृत्यू झाला होता. या घटनेची गंभीरतेने दखल घेत रायगड किल्ल्याच्या उंच कड्यावरील सुटलेले दगड काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. २८ व २९ मे या कालावधीत ही मोहीम पार पडणार आहे. दरम्यान पायरी मार्गाने गड चढणाऱ्या मावळ्यांसाठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे. कार्यकारी अभियंता विशेष पथक व दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई यांनी निखळलेले दगड काढण्यासाठी प्रशिक्षित रॅपलर्सची नियुक्ती केल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.

रोप वे सुविधा सुरू राहणार
सुटलेले दगड काढण्याच्या मोहिमेदरम्यान चित्त दरवाजा, नाणे दरवाजा, गडावरील शिरकाई मंदिर, होळीचा माळ व इतर आवश्यक प्रवेशद्वारांवर पोलीस बंदोबस्त तैनात करून हा मार्ग पायी वाटचालीसाठी बंद ठेवावा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी रायगड पोलीस अधीक्षकांना दिल्या आहेत, तर या कालावधीत रायगड रोप वेची सुविधा सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आतड्यातील घाण झटक्यात होईल स्वच्छ, उपाशी पोटी सेवन करा या पाच गोष्टी आतड्यातील घाण झटक्यात होईल स्वच्छ, उपाशी पोटी सेवन करा या पाच गोष्टी
डाळिंबात फायबर असते. डाळिंबाच्या सेवनाने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. तुमची पचनसंस्था निरोगी राहते. डाळिंबामुळे अन्न लवकर पचते. तसेच पोटात मल सडत...
India Squad For England Tour – इंग्लंड दौऱ्यात गिल कर्णधार, तर उपकर्णधारपदीही नवा खेळाडू; हिंदुस्थानचा संपूर्ण संघ जाणून घ्या…
हे राम… जव्हार येथे चोरट्यांनी हद्दच केली; स्मशानभूमीतील चितेचे लोखंडी स्टँडच चोरट्यांनी कापून नेले
ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात ‘कोरोना वॉर्ड’; कोपरीत तीन रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर, 40 कोविड बेड सज्ज
SDM वर बंदूक रोखणाऱ्या भाजप आमदाराचे सदस्यत्व रद्द; राजस्थान विधानसभा अध्यक्षांची कारवाई
Karuna Munde : त्या सुंदर दिसतात म्हणून…, वादात करुणा मुंडेंची उडी, आरोपांच्या अशा उडवल्या फैरी
काळजाचा ठोकाच चुकला… विराटला चेंडू लागताच अनुष्काचा जीव खालीवर