देशाचे परराष्ट्र धोरण पुरते कोलमडले, ऑपरेशन सिंदूरवरून राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर टीका
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूरवरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात परराष्ट्र धोरण तोंडघशी पडले आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी ट्विट करून पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
Will JJ explain:
• Why has India been hyphenated with Pakistan?
• Why didn’t a single country back us in condemning Pakistan?
• Who asked Trump to “mediate” between India & Pakistan?India’s foreign policy has collapsed. https://t.co/m8q2lAFRm4
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 23, 2025
राहुल गांधी यांनी ट्विटमधून केंद्र सरकारला तीन सवाल केले आहेत. जेजे स्पष्ट करणार का? हिंदुस्थानला पाकिस्तानसोबत का जोडण्यात आले? पाकिस्तानचा निषेध करण्यात एकाही देशाने हिंदुस्थानला पाठिंबा का दिला नाही? हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्यास ट्रम्प यांना कोणी सांगितले? असे प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले. एकूणच हिंदुस्थानचे परराष्ट्र धोरण पुरते कोलमडले आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List