‘त्या’ विधानानंतर चंद्रकांतदादांना बारामतीला यायला मज्जाव?,अजितदादांनी सांगितलं आतलं राजकारण

‘त्या’ विधानानंतर चंद्रकांतदादांना बारामतीला यायला मज्जाव?,अजितदादांनी सांगितलं आतलं राजकारण

Lok Sabha Election 2024 मध्ये राजकीय धुमशान सुरु आहे. तीन टप्प्यातील मतदान झाले आहे. तळपत्या उन्हात महाविकास आघाडी आणि महायुतीने एकमेकांविरोधात आग ओकली आहे. एकमेकांवर तुटून पडण्याची एकही संधी दोन्ही गटांनी सोडलेली नाही. अनेक ठिकाणी एकमेकांना खो देण्याचा प्रयत्न झाला आहे. तर भाजपने पण मित्रपक्षांना खो दिल्याचे अनेक मतदारसंघात समोर आले आहे. मतदारसंघचं पळविण्यात आले आहेत. त्यातच महायुतीतील एक अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. चंद्रकांतदादा विरुद्ध अजितदादा असा सामना झाला. त्यात आता एक सीमारेषा आखली गेली आहे.

दोन दादांत नाराजीचा सूर का?

निवडणुकीच्या धामधुमीत चंद्रकांत पाटील यांचे एक वक्तव्य फार चर्चेत आलं. “शेवटी राजकारणात एक तराजू लावायचा असतो. काय वजनदार आहे, काय हलकं आहे, आम्हाला शरद पवार यांचा पराभव जास्त महत्त्वाचा आहे. मला आणि माझ्या कार्यकर्त्याला शरद पवार यांचा पराभव हवा आहे. बाकी काही नको”, असं ते म्हणाले होते. एकप्रकारे चिमटाच त्यांनी काढला होता. त्यांच्या वक्तव्याने अजितदादा मात्र दुखावल्या गेले. त्यांनी या वक्तव्यावर त्यांची नाराजी बोलून दाखवली.

अजितदादांची नाराजी

“हल्ली कुणाला भाषणाला बोलवायचीही मनात भीती वाटते”, असा टोला अजित पवार यांनी महायुतीच्या समन्वय बैठकीत हाणला. अर्थात त्यांचा रोख हा चंद्रकांत पाटील यांच्यावर होता, हे वेगळं सांगायची गरज नाही. ही धुसफूस चव्हाट्यावर आल्यावर चंद्रकांतदादांनी अद्याप त्यावर प्रतिक्रिया दिली नाही.

चंद्रकांतदादांन बारामतीत येण्यास मज्जाव

शरद पवारांचा पराभव करणे हेच आमचे उदीष्ट हे चंद्रकांत पाटील यांचे विधान चुकीचे. त्यांची चुक झाली हे मी मान्य करतो. त्यानंतर आम्ही त्यांना सांगितले तुम्ही बारामतीत येऊ नका. आम्ही पाहतो. त्यानंतर ते चुप आहेत, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

शरद पवारांच्या वक्तव्याचा समाचार

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत शरद पवार यांनी राजकीय बॉम्ब टाकला. काँग्रेसमध्ये अनेक पक्ष विलीन होऊ शकतात, असे संकेत त्यांनी दिले. राष्ट्रवादी शरद पवार गट सुद्धा काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे संकेत दिले.अजित पवार यांनी काकांचे विधान फारसे काही मनावर घेतले नाही. शरद पवार यांच्यासोबत दीर्घ राजकीय प्रवास त्यांनी केला आहे. शरद पवार अथवा उद्धव ठाकरे हे काही काँग्रेसमध्ये विलीन होणार नाहीत. कधी कधी संभ्रम निर्माण होण्यासाठी ते असे विधान करतात, असा टोला त्यांनी हाणला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;