सर्वात मोठी राजकीय बातमी… शरद पवार यांचा भाजपच्या बड्या नेत्याला फोन; प्रकाश आंबेडकर यांचा मोठा गौप्यस्फोट

सर्वात मोठी राजकीय बातमी… शरद पवार यांचा भाजपच्या बड्या नेत्याला फोन; प्रकाश आंबेडकर यांचा मोठा गौप्यस्फोट

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. चार दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी भाजपचे नेते राजनाथ सिंह यांना फोन केला होता, असा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आजारी असताना आणि निवडणुकीच्या काळात कोणी असा एकमेकांना फोन करतं का? असा सवाल करतानाच राजनाथ सिंह यांच्याशी काय चर्चा झाली? ही चर्चा शरद पवार यांनी सार्वजनिक करावी, अशी मागणीच प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आंबेडकर यांच्या या धक्कादायक गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मीडियाशी संवाद साधताना हा गौप्यस्फोट केला आहे. चार दिवसांपूर्वी शरद पवार यांनी राजनाथ सिंह यांना फोन केला होता. राजनाथ सिंह यांच्यासोबत शरद पवार यांचे काय बोलणे झाले आहे हे आम्ही विचारू इच्छितो. राष्ट्रवादीच्या 5 जागांसंदर्भात चर्चा झालीय का? किंवा एकनाथ शिंदे मुंबईच्या तीन जागा लढत आहेत, त्यासंदर्भात चर्चा झालीय का? किंवा उद्धव ठाकरे यांच्याबाबत चर्चा झालीय का?, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

तब्येत बिघडल्यावर कोणी फोन करत नाही

ऐन निवडणुकीत कोणाची तब्येत बिघडली तरी कॉल करत नाही. पण शरद पवार यांनी राजनाथ सिंग यांना कॉल का केला? याचा खुलासा करावा. ऐन निवडणुकीत फोन का करण्यात आला? याचा खुलासा केला पाहिजे. उत्तरं देताना कोणतीही बालबोध उत्तर देऊ नका, खरं कारण काय हे त्यानी सांगावं. आम्हाला ज्या शंका आहेत त्या आम्ही सांगितल्या. कॉल केला की नाही त्यांनी सांगावं. पुढे आम्ही काय ते बोलू, असं आंबेडकर म्हणाले. निवडणुकीत असे फोन केले जात नाही. त्याचे वेगळे अर्थ निघतात. त्यामुळे शरद पवार यांनी खुलासा करावा. मुंबईत एकनाथ शिंदे यांना मदत करण्यासाठी फोन केला का?, असा सवालही त्यांनी केला.

सुप्रिया सुळेंसाठी काम केलं

आम्ही बारामतीमध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याचाही निर्णय घेतला होता. त्यानुसार आम्ही त्यांच्या पाठी उभे राहिलो. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या विजयासाठी काम करायला सांगितले होते, असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;